• Wed. Jun 10th, 2026
    मुंबई किनारपट्टी सुरक्षेला बळ; जुहूला तटरक्षक दल लवकरच हेलिकॉप्टर तळ उभारणार

    Indian Coast Guard Day 2025: मुंबई किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी तटरक्षक दलाचा नवा तळ लवकरच मुंबईतच उभारण्यात येणार आहे. जुहू एअरोड्रम येथे हा तळ असेल. तो पूर्णपणे हेलिकॉप्टरने सज्ज असेल.

    महाराष्ट्र टाइम्स
    mumbai helicopter

    मुंबई : मुंबई किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी तटरक्षक दलाचा नवा तळ लवकरच मुंबईतच उभारण्यात येणार आहे. जुहू एअरोड्रम येथे हा तळ असेल. तो पूर्णपणे हेलिकॉप्टरने सज्ज असेल. १ फेब्रुवारी या भारतीय तटरक्षक दलाच्या स्थापनादिनानिमित्ताने याबाबत महत्त्वाच्या हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    तटरक्षक दलावर प्रामुख्याने किनारपट्टीपासून १२ सागरी मैल अंतरापर्यंतच्या समुद्राच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. मात्र, त्यापुढे २०० सागरी मैल अंतरापर्यंतच्या विशेष आर्थिक क्षेत्रातही (ईईझेड) तटरक्षक दलाकडून मोहिमा सुरू असतात. यासाठी तटरक्षक दलाच्या मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम सीबोर्ड भागात २१६० किमीची किनारपट्टी व ९ लाख चौरस किमीचे ईईझेड यांचा समावेश आहे. या समुद्राच्या सुरक्षेसाठी दोन क्षेत्र, पाच जिल्हा मुख्यालय (एका राज्याचा एक जिल्हा) व पाच हवाईतळ आहेत. हवाईतळांमध्ये पोरबंदर, दमण, रत्नागिरी, गोवा व कारवार यांचा समावेश आहे. या पाचही हवाईतळांवर विमाने व हेलिकॉप्टर या दोघांचाही समावेश आहे. मात्र, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असताना व संपूर्ण पश्चिम सीबोर्डचे मुख्यालय असतानाही मुंबईसाठी स्वतंत्र असा हवाईतळ आज तटरक्षक दलाकडे नाही. तो आता मुंबईला मिळणार आहे.
    डॉक्टर बनला हत्यारा! मेहुणीच्या प्रेमात बायकोला संपवलं, अ‍ॅसिडिटीच्या नावाखाली दिलेल्या झोपेच्या गोळ्या अन्…
    हा तळ जुहू एअरोड्रमवर उभारण्यात येणार आहे. हा पूर्णपणे हेलिकॉप्टर सेवा देणारा तळ असेल. त्यामध्ये गरजेनुसार चेतक व एएलएच (ध्रृव) हेलिकॉप्टर असतील, अशी माहिती तटरक्षक दलातील उच्चाधिकाऱ्यांनी दिली.

    एकूण ५६ नौका, १४ हेलिकॉप्टर, १० विमाने
    तटरक्षक दलाच्या पश्चिम सीबोर्डमध्ये गुजरात ते केरळपर्यंतच्या (लक्षद्विपसह) क्षेत्राचा समावेश आहे. त्यामध्ये सध्या पाच हवाईतळांखेरीज आठ तळांवर ५६ युद्धनौका, १४ हेलिकॉप्टर व १० विमाने सेवा देत आहेत. संपूर्ण देशाचा विचार केल्यास हा आकडा अनुक्रमे १५२, ३७ व ३९ इतका आहे. हा आकडा २०३० पर्यंत २०० युद्धनौका व १०० हवाई सामग्रीपर्यंत नेण्याचे लक्ष्य तटरक्षक दलाने निमित्ताने निश्चित केले आहे.

    मुंबईसाठी सध्या दोनच हेलिकॉप्टर असून, ती सांताक्रुझ विमानतळावर असतात. अनेकदा विमानतळ व्यग्रतेमुळे त्यांच्या उड्डाणात अडथळा येतो. त्यासाठीच जुहू येथे स्वतंत्र तळ उभा केला जात आहे. तेथे आवश्यकतेनुसार हेलिकॉप्टर तैनात असतील. पावसाळ्यानंतर हा तळ कार्यान्वित होईल. – महानिरीक्षक भिषम शर्मा , पश्चिम क्षेत्र प्रमुख, तटरक्षक दल

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed