• Sat. Sep 19th, 2026

शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक; बैठकीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गावातून पिटाळून लावलं

शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक; बैठकीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गावातून पिटाळून लावलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2025, 8:16 pm

शक्तिपीठ महामार्ग नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील काही गावातून जात आहे. आज उमरी गावात अचानक मंडळ अधिकारी, तलाठी आणि काही इतर कर्मचारी आले. शक्तिपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांना हे अधिकारी माहिती देत होते.पण त्यांना संतप्त शेतकऱ्यांनी धारेवर धरत बैठकीचे लेखी आदेश दाखवा असं…म्हणत धारेवर धरले. आम्हाला हा महामार्ग नको, रस्त्याचा एकही पोल लावू देणार नाही. एकच जिद्द शक्तिपीठ रद्द, शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. वातावरण तणावपूर्ण बनत असल्याचे पाहून अधिकाऱ्यांनी गावातून काढता पाय घेतला.शक्तीपीठ महामार्गाचा पोल लावायला येईल त्याचा मर्डर होणारच असंही एक शेतकरी म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *