• Thu. Jun 18th, 2026
    अटल सेतूवरील टोलबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, किती पैसे मोजावे लागणार? पुढील एक वर्षभर…

    Atal Setu Toll Tax : अटल सेतूवरील टोलबाबत महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. या पुलावरील प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासाजनक बातमी असून याचा प्रवाशांना फायदा होणार आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : अटल सेतूवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी महत्त्वाची बातमी आहे. अटल सेतूच्या टोल टॅक्समध्ये पुढील एक वर्ष कोणतीही वाढ होणार नसल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय अटल सेतूवर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे.
    Mumbai News : दीड तासांचा प्रवास वीस मिनिटांवर येणार,गोरेगाव-मुलुंड लिंक रोड वरदान ठरणार

    पुढील वर्षभर अटल सेतूचा टोल वाढणार नाही

    अटल सेतू जानेवारी २०२४ मध्ये सुरू करण्यात आला होता. अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल पुलाचा टोल २५० रुपये आहे. हा टोल वाढणार असल्याची चर्चा होती. मात्र आता मुंबईकरांना पुढील १२ महिने, वर्षभर अतिरिक्त टोल भरावा लागणार नाही. अटल सेतूवरुन रोज प्रवासात करणाऱ्यांसाठी हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे.
    मुंबई – पुणे प्रवास आता सुस्साट… चार तासांचं अंतर दीड तासात; कसा, कुठून असेल नवा मार्ग? कधी सुरू होणार?

    देशातील सर्वात मोठा समुद्री पूल

    अटल सेतू देशातील सर्वात मोठा समुद्री पूल आहे. या मार्गामुळे मुंबईतील शिवडी – नवी मुंबई जोडलं जातं. अटल सेतूमुळे दक्षिण मुंबईहून पनवेल, पुणे, नवी मुंबई या ठिकाणी प्रवास करणं सोपं झालं आहे. अटल सेतूने दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवीन कनेक्टिव्हिटी प्रदान केली आहे. तसंच या मार्गामुळे प्रवासाचा वेळही वाचतो आहे. दररोज मुंबई ते नवी मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा, सुविधेचा मार्ग ठरतो आहे.
    मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास केवळ १५ मिनिटांत, दहिसरपर्यंत असा होणार फायदा; २६ जानेवारीला खुला होणार मार्ग
    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १२ जानेवारी २०२४ रोजी या अटल सेतूचं उद्धाटन केलं होतं. मागील वर्षा जानेवारीमध्ये हा पूल प्रवासासाठी खुला झाल्यानंतर आतापर्यंत ५० लाख वाहनांनी यावरुन प्रवास केला आहे. या मार्गावरुन केवळ बस, खासगी कार जाऊ शकतात. अटल सेतूची एकूण लांबी २१.८ किलोमीटर आहे. पुलाचा १६.५ किलोमीटरचा भाग समुद्रातून आहे, तर ५.५ किलोमीटरचा भाग जमिनीवर आहे.

    Atal Setu : अटल सेतूवरील टोलबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, किती पैसे मोजावे लागणार? पुढील एक वर्षभर…

    ६ लेन अटल सेतूमुळे मुंबई – नवी मुंबईतील अंतर कमी झालं

    अटल सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर कमी झालं आहे. अटल सेतू बनण्याआधी मुंबई – नवी मुंबई असा प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या ट्रॅफिक समस्येचा सामना करावा लागत होता. मात्र अटल सेतूमुळे ही समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे. हा ६ लेन असलेला अटल सेतू सुरुवातीला मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (MTHL) या नावाने उभारण्यात आला होता. मात्र नंतर त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतू, असं करण्यात आलं.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed