Sharad Pawar And Devendra Fadnavis : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीये. देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच सांगितले आहे की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणालाही सोडणार नाहीये. जो आरोपी आहे त्याला शिक्षा होणार.
पवनचक्की मालकांना येत असलेल्या धमक्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांनी फोन केला होता. विशेष म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चार दिवस अगोदरच शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून धमक्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. वारंवार खंडणीचे प्रकार होत असल्याचा मुद्दा मुख्यमंत्र्यांकडे उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती.
राष्ट्रवादीतील बड्या मुन्नीची सुन्नी करणार; सुरेश धसांचा खळबळजनक दावा, चर्चांना उधाणशरद पवारांच्या फोननंतर देवेंद्र फडणवीस यांनी दहशत मोडून काढण्याचे आश्वासन दिले होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाच्या एका नेत्याने ही माहिती एका वृत्त वाहिनीला दिलीये. वाल्मिक कराड याने पवनचक्की मालकाला दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणीच वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा हा दाखल आहे. त्याबद्दल चाैकशी सुरू असून वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करण्यात आले.
शरद पवारांनी CM फडणवीसांना ‘तेव्हाच’ फोन केलेला; पवनचक्की चालकांबद्दल व्यक्त केलेली चिंता
वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्येतील मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड, परभणी आणि पुण्यात मोर्चा काढण्यात आला. आरोपींना तात्काळ फाशी देण्याची मागणी ही सातत्याने केली जातंय. लातूर सकल मराठा समाज हा आक्रमक झाला होता. यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात आली. अंजली दमानिया यांनीही काही गंभीर आरोप केले. वंजारी समाज हा अंजली दमानिया यांच्याविरोधात आक्रमक झालाय.

