• Mon. Mar 9th, 2026
    मनमोहन सिंग यांचे मुंबईवर विशेष प्रेम, मेट्रोचे पूर्ण श्रेय त्यांनाच देतो, संजय राऊतांचे विधान

    देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 92 व्या वर्षी निधन झाले. दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. निधनानंतर अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. संजय राऊत यांनी त्यांच्या कार्याबद्दल भाष्य केले. विशेषत: आर्थिक योजनांबद्दल त्यांनी योगदान दिले. मनमोहन सिंग यांचे मुंबईवर विशेष प्रेम असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची 92 व्या वर्षी प्राणज्योत मावळली. दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धाजंली वाहिली. संजय राऊत यांनी देखील मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. राऊत म्हणाले की, नोटबंदीमुळे देशाचा जीडीपी दोन टक्क्याने घसरेल, असा इशारा मनमोहन सिंग यांनी दिला होता. अशाप्रकारचे अनेक मोठे इशारे त्यांनी सरकारला दिली आणि ते खरे देखील ठरले.

    पुढे संजय राऊत म्हणाले, मनमोहन सिंग हे विकास पुरूष होते. देशाच्या तिजोरीमध्ये फक्त 16 दिवस पुरेल इतकेच महसूल शिल्लक असताना त्यांच्या हातामध्ये देशाचे अर्थखाते देण्यात आले. अनेक नवीन योजना त्यांनी आणल्या. आज जे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 85 कोटी जनतेला गरीबांना फुकट धान्य देत आहेत. कोणीही उपाशी राहणार नाही. प्रत्येकाच्या घरात चूल पेटेल. ही योजना मुळ मनमोहन सिंह यांची आहे.
    Raj Thackeray : मनमोहन सिंगांनी न बोलता केलं, अनेकांना बोलूनही करता आलं नाही, राज ठाकरेंकडून सूचक आदरांजलीअन्न सुरक्षा कायदा हा मनमोहन सिंग यांनी आणला. रोजगार हमी योजना प्रत्येकाला काम मिळले पाहिजे, हे देखील त्यांची योजना आहे. अशा अनेक योजना त्यांनी देशाच्या जनतेसाठी आणल्या. पुढे राऊत म्हणाले, अत्यंत प्रमाणिक म्हणून त्यांचा बोलबाला होता आणि तो शेवटपर्यंत टिकला. माजी पंतप्रधान असूनही देश त्यांच्या जाण्याने दु:खी आहे. मुंबईवर त्यांचे विशेष प्रेम होते. कारण ते मुंबईमध्ये रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर होते.

    मुंबईमध्ये जी मेट्रो दिसते, त्याचे श्रेय कोणीही घेऊ द्या. त्याचे श्रेय मी फक्त मनमोहन सिंग यांनाच देईल. मेट्रोच पहिल्या फेसच उद्धाटन त्यांच्या हस्ते झाले. मुंबईच्या विकासासाठी त्यांची काही स्वप्ने होती. त्यांनी फार काही गाजावाजा न करता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब ठाकरे आणि मनमोहन सिंग यांचे अत्यंत चांगले संबंध होते. जातीय धर्माचे द्वेश न करणारा तो नेता होता. त्यांचे जाणे हे अत्यंत दुखदायक असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed