• Wed. Mar 11th, 2026
    नागपुरात फडणवीस-ठाकरे भेट, सुषमा अंधारे म्हणतात – खरा अस्वस्थ तर शिंदे गट…

    Sushma Andhare News: नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर आता सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    हायलाइट्स:

    • नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे भेट
    • सुषमा अंधारे म्हणतात भुवया उंचावण्याचं कारण नाही
    • खरी अस्वस्थता व्हायला हवी ती शिंदे गटातील लोकांची

    Fadnavis-Uddhav Thackeray Meet: नागपुरात फडणवीस-ठाकरे भेट, सुषमा अंधारे म्हणतात – खरा अस्वस्थ तर शिंदे गट…

    मुंबई: विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि राज्याच्या राजकारणातील गेम फिरला. लोकसभेत बहुमताने जिंकलेल्या महाविकास आघाडीला विधानसभेत मात्र मोठा पराभव स्विकारावा लागला. तर, महायुती सरकारने आपली सत्ता स्थापन केली, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि मंत्रिमंडळ विस्तारही पार पडला. त्यानंतर नव्या सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरु आहे. राजकारणातील समीकरणं बदलताच पक्ष आणि नेत्यांच्या भूमिकाही बदलतात, हे अनेकदा पाहायला मिळतं. तसंच काहीसं आज नागपुरात घडलं. गेल्या अडीत वर्षांपासून ज्यांनी एकमेकांकडे सरळ तोंडाने बघितलं नाही, ज्यांच्यावर अगदी टोकाची भूमिका घेत टीका केली ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली. उद्धव ठाकरे हे आज फडणवीसांच्या कार्यालयात त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आणि साऱ्यांच्या भुवया उंचावल्या.

    तर, ज्यांनी नेहमीच फडणवीस हे शिवसेना पक्ष फुटीतले व्हिलेन असल्याचा आरोप केला त्या उबाठा नेत्या सुषमा अंधारे यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना यात भुवया उंचावण्याचं काहीही कारण नसल्याचं सांगितलं.
    Chhagan Bhujbal: नाराजी दूर करण्यासाठी अजितदादांकडून राज्यसभेची ऑफर, भुजबळांचा स्पष्ट नकार

    शिंदे मुख्यमंत्री होते, पण सूत्रधार हे फडणवीसच होते

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, याबाबत भुवया उंचावण्याचं काही कारण नाही. देवेंद्र फडणवीस हे फक्त एक व्यक्त नाही तर एका राज्य संस्थेचे प्रमुख म्हणून त्यांना भेटायला उद्धव ठाकरे गेले आहेत. सध्या महाराष्ट्रातील जे अनेक प्रश्न आहेत, मराठवाडा अशांत आहे, बीड प्रकरण, परभणी जाळपोळ हिंसाचार असेल, त्यातील जबाबदार पोलिसांच्या बडतर्फीची मागणी असेल, दोन मृत्यू झाले त्याची चौकशी करायची आहे, अशा अनेक मुद्द्यांवर राज्यसंस्थेच्या प्रमुखांशी बोलणं गरजेचं आहे, जर पक्षप्रमुख ती मांडणी करत असतील तर त्यात काही हरकत नाही.

    यापूर्वीही फडणवीस मुख्यमंत्री झाले होते, तेव्हा अशी काही भेट झाली नाही, एकनाथ शिंदेंची भेट घेतली नाही, आताच का ही भेट झाली, या प्रश्नांचं उत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाल्या की भाजप नेत्यांसोबत यापूर्वीही भेटी झाल्या आहेत, त्याच्या बातम्याही झाल्या. राहिला प्रश्न एकनाथ शिंदेंचा, तर त्यांनी ज्या पद्धतीने पक्षप्रमुखांचा विश्वासघात केला ते कोणालाच आवडणार नाही, ते मुख्यमंत्री राहिले असले तरी खरे सूत्रधार हे फडणवीसच होते. शिंदे गटाच्या कुठल्या नेत्याने निवडणूक लढवावी, कुणी नाही, कुठून लढवावी हे सारं तेच ठरवायचे, त्यामुळे एकनाथ शिंदेंना भेटण्याचं काही कारणच नव्हतं.

    पुण्यात उद्धव ठाकरे यांनी एकतर तू राहाशील किंवा मी राहिन, या वाक्यावर भूमिका स्पष्ट केली होती, माध्यमांनी उद्धव ठाकरे आणि फडणवीस असं चित्र उभं केलं होतं. मात्र, मी हे वाक्य कधीही देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भात वापरलेलं नाही, त्याला जी किनार आहे केंद्रातील नेत्यांची आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

    Fadnavis-Uddhav Thackeray Meet: नागपुरात फडणवीस-ठाकरे भेट, सुषमा अंधारे म्हणतात – खरा अस्वस्थ तर शिंदे गट…

    खरी अस्वस्थता तर शिंदे गटाची व्हायला हवी – सुषमा अंधारे

    उद्धव ठाकरे भेटायला गेले म्हणजे पॅच अप होणार आहे, हातात हात घालून बाहेर येणार आहेत, आता फडणवीस शिंदे-अजितदादांचा हात सोडणार आहेत, असं होत नाही. या सर्वामुळे खरी अस्वस्थता व्हायला हवी ती शिंदे गटातील लोकांची व्हायला हवी.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed