मनोज जरांगे पाटील पुन्हा २५ जानेवारीपासून उपोषणाला बसणार आहेत.मनोज जरांगे यांनी सरकारला दोन महिन्याचा अल्टिमेट दिलाय.जरांगेंना अंगावर घेतल्यानं मंत्रिपद मिळालं नाही असं छगन भुजबळ म्हणाले.छगन भुजबळ हा पक्ष फोड्या आहे असं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर टीका केली.भुजबळांना मंत्रिपद न दिल्यानं ओबीसी समाज कोणताही नाराज नाही असं जरांगे म्हणाले.२५ जानेवारीपर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या असंही जरांगेंनी सांगितलं.