• Mon. Mar 9th, 2026
    नवनीत राणांचं पुनर्वसन होणार; भाजपचा बडा नेता राज्यात पुन्हा येणार? ‘एक्स्चेंज प्लान’ चर्चेत

    Anil Bonde: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. महायुती सरकार सत्तेत येऊन ५ दिवस उलटले, तरीही अद्याप खातेवाटप जाहीर झालेलं नाही.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. महायुती सरकार सत्तेत येऊन ५ दिवस उलटले, तरीही खातेवाटप जाहीर झालेलं नाही. खातेवाटपाच्या चर्चा सुरु असताना राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांना राज्यात मंत्री म्हणून आणण्याच्या हालचाली भाजपनं सुरु केल्या आहेत. त्यांच्या जागी नवनीत राणांना संसदेत पाठवलं जाऊ शकतं.

    नवनीत राणा २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या. अमरावती मतदारसंघातून त्या अपक्ष निवडून आल्या. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्ह्यातील भाजप नेते, कार्यकर्ते यांच्यासह महायुतीच्या नेत्यांचा विरोध असतानाही त्यांचा पक्षप्रवेश झाला. त्यांना उमेदवारी दिली गेली. पण काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला. राणा यांची भूमिका भाजपला पूरक राहिलेली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी हनुमान चालिसा पठणाचा मुद्दा गाजवला होता. त्या सातत्यानं ठाकरेंना लक्ष्य करतात. लोकसभेतील पराभवानंतर त्या संसदेत जाण्यास उत्सुक आहे. त्यांची ही मागणी लवकरच पूर्ण होऊ शकते.Devendra Fadnavis: ‘एक है तो सेफ है’चा दादा, भाईंना फटका; २ मंत्र्यांना घरचा रस्ता? CMचं PMच्या पावलावर पाऊल?
    अमरावतीमधील भाजपचे नेते अनिल बोंडेंनी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून काम केलं आहे. नवनीत राणा यांच्याप्रमाणेच तेदेखील आक्रमक नेते आहेत. आता या दोन आक्रमक नेत्यांना भाजप एक्स्चेंज करण्याच्या तयारीत आहे. बोडेंना दिल्लीतून राज्यात पुन्हा आणण्यात येईल. त्यांना फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातही स्थान दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. बोंडे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर राणा यांची वर्णी लागेल. पुढारीनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

    अमरावतीत पहिल्यांदाच भाजपचे पाच आमदार निवडून आलेले आहेत. या विजयात बोंडे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे बोंडेंना पुन्हा राज्यात आणून त्यांना मंत्री करण्याचा भाजप नेतृत्त्वाचा मानस आहे. बोंडे यांच्या रुपात अमरावतीला मंत्रिमंडळात स्थान मिळेल. बोंडे ५ जुलै २०२२ रोजी राज्यसभेवर गेले. त्यांचा कार्यकाळ २०२८ पर्यंत आहे. त्यामुळे त्यांच्या जागी खासदार होणाऱ्या राणांना साडे तीन वर्षांचा कार्यकाळ मिळेल. सध्याच्या घडीला महायुतीकडे असलेलं संख्याबळ पाहता राणा पोटनिवडणुकीत आरामात विजयी होतील.
    महायुतीचा दिलदारपणा मविआला महागात? विरोधकांमध्ये जुंपली; ठाकरेसेना, काँग्रेसमध्ये ‘सामना’
    नवनीत राणांना राज्यसभेवर संधी दिल्यास काँग्रसचे खासदार बळवंत वानखेडेंची अस्वस्थता वाढू शकते. राणांना खासदारकीचं बळ असल्यास त्या वानखेडेंना आव्हान देण्याची कामगिरी करु शकतात. राणांच्या बदल्यात राज्यात येणाऱ्या बोंडेंना मंत्रिपदाचा अनुभव आहे. त्याचा फायदा भाजपला होईल. राज्य विधान परिषदेच्या ६ जागा रिक्त झालेल्या आहेत. त्यामुळे बोंडेंना मंत्रिपदी संधी दिल्यास त्यांना ६ महिन्यांत विधिमंडळाचं सदस्य करुण घेणं भाजपसाठी अवघड नसेल.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed