शाश्वत आरक्षणासाठी गेल्या तीन दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये राजेंद्र दाते पाटील यांचे उपोषण सुरू आहे. मराठा समाजातील काही लोकांना कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून आरक्षणाचा लाभ मिळत असला, तरी प्रमाणपत्र न मिळणारा मोठा घटक अद्याप आरक्षणाच्या लाभापासून वंचित असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अशा कुणबी प्रमाणपत्र मिळत नसलेल्या मराठ्यांना देखील ओबीसी समाजाला मिळणाऱ्या सवलतींप्रमाणे शिक्षण आणि सरकारी नोकरीत सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी दाते पाटील करीत आहेत.