15 KG Tumor Removed From Woman Stomach : महिलेच्या पोटातून डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत तब्बल १५ किलोचा ट्यूमर, गाठ काढली आहे. या शस्त्रेक्रियेनंतर महिलेला जीवदान मिळालं आहे.
अनेक दिवसांपासून महिलेला पोटाचा त्रास
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील बिलकेस बी कुरेशी या महिलेला पोटाचा आजार होता. त्या महिलेचं शरीर देखील हळूहळू लठ्ठ होतं चाललं होतं. कुटुंबियांनी डॉक्टरकडे याबाबत दाखवल्यानंतर महिलेची सोनोग्राफी करण्यात आली. सोनोग्राफी रिपोर्टमध्ये पोटात गाठ असल्याच समोर आलं. त्यानंतर त्यांनी अनेक रुग्णालयात उपचार केले. मात्र, निदान काही होतं नव्हतं. पोटातील मांसल गाठ काढण्यासाठी डॉक्टर देखील जोखीम घेत नव्हते. त्यानंतर कुटुंबियांनी महिलेला त्रास होऊ लागल्यानंतर ६ डिसेंबर रोजी नांदेड शहरातील गोवर्धनघाट परिसरातील तोटावार हॉस्पिटलमध्ये भरती केलं. डॉ. आशा तोटावार यांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.
Mumbai News : ५० डॉक्टरांची टीम, १० तास शस्त्रक्रिया; ‘केईएम’ रुग्णालयाने यशस्वी हृदयप्रत्यारोपण करत रचला इतिहास
पोटातून काढली १५ किलो ४५ ग्राम वजनाची गाठ
अडीच तास चालेल्या या शस्त्रक्रिये दरम्यान, डॉ. आशा तोटावार यांनी महिलेच्या पोटातून २७ सेंटीमीटर लांब आणि १५ किलो ४५ ग्राम वजनाची गाठ काढली. विशेष म्हणजे शस्त्रक्रिये दरम्यान गाठ फुटली असती, तर महिलेच्या जीवाला मोटा धोका देखील होता, मात्र डॉक्टरांनी अतिशय सावधगिरीने, यशस्वी शस्त्रक्रिया करून महिलेला जीवनदान दिलं. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डॉ. आशा तोटावार यांनी यापूर्वी अशा अनेक शस्त्रक्रिया करून इतर महिला रुग्णांच्या पोटातून गाठी काढल्या आहे.
सततच्या पोटदुखीमुळे तरुणीवर शस्त्रक्रिया; ऑपरेशनंतर पोटातून काढला भलामोठा गोळा, डॉक्टरही हैराण; काय आजार?
नुसते पोट सुटत असेल तर डॉक्टरांना दाखवा
चांगलं आरोग्य राखणं प्रत्येकासाठी आवश्यक आहे, परंतु स्त्रियांसाठी त्यांच्या शारीरिक आणि हार्मोनल बदलांमुळे याकडे विशेष लक्ष देणं महत्त्वाचं आहे. पोषण, व्यायाम आणि मानसिक आरोग्य यांचा समावेश असलेल्या निरोगी सवयी स्त्रियांना परिपूर्ण जीवन जगण्यास आणि त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक उद्दिष्टं साध्य करण्यास सक्षम बनवू शकतात. तसंच वयाच्या चाळीशीनंतर बराचशा महिलांना आपलं वजन वाढत असल्याचं वारंवार वाटतं. तसंच बऱ्याच वेळा केवळ पोटाचा भागच सुटतो. सर्वसाधारण बाब समजून महिला याकडे दुर्लक्ष करतात. परंतु असं होत असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, असं डॉ. आशा तोटावार यांनी सांगितलं.

