महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सत्तेत आली असून, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. तीन दिवसीय विशेष अधिवेशनादरम्यान, विरोधकांनी ईव्हीएम निषेधार्थ पहिल्या दिवशी शपथ घेतली नव्हती. महाविकास आघाडीला धक्का बसला असून अबू आझमी हे आघाडीतून बाहेर पडले आहेत.
काल अबू आझमी हे महाविकास आघाडीवर मोठा आरोप करताना दिसले. ते महाविकास आघाडीमधून बाहेर पडले आहेत. आता अबू आझमी यांच्यावर जोरदार टीका करताना आदित्य ठाकरे हे दिसले आहेत. आदित्य ठाकरे म्हणाले की, अबू आझमी हे भाजपाच्या बी टीमसारखे वागतात. यामुळे मला त्यांच्यावर काही बोलायचे नाहीये. आदित्य ठाकरे यांनी थेट अबू आझमी यांना भाजपाची टीम बी म्हटले आहे.
Sharad Pawar : मारकडवाडीतून शरद पवार कडाडले, थेट देवेंद्र फडणवीसांना सवाल करत म्हणाले…
अबू आझमी यांनी काल उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आपण महाविकास आघाडीमधून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट केले. पराभवानंतर शिवसेनेने आपली विचारधारा परत बदलल्याचा आरोपा अबू आझमी यांनी केला. हिंदुत्वाचा मुद्दा कायम राहिल. मात्र, त्यांनी असे म्हटले नाही की, सर्व धर्मांना एकसोबत घेऊन चालू. यावर अबु आझमी यांनी थेट नाराजी जाहीर केली.
अबू आझमी यांनी कालच स्पष्ट केले की, मी अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करेल आणि सांगेल की आम्ही महाराष्ट्रात सोबत राहू शकत नाहीत. आता त्यामध्येच आदित्य ठाकरे हे अबू आझमी यांच्याबद्दल बोलताना दिसले आहेत. आता आदित्य ठाकरे यांच्या टिकेवर अबू आझमी हे नेमके काय उत्तर देतात हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून अबू आझमी हे महाविकास आघाडीतून बाहेर पडले.

