• Fri. Mar 20th, 2026
    एक्झिट पोलनुसार कापूस पट्ट्यात भाजपच पुन्हा! लोकसभेतील फटक्यानंतर विधानसभेत महायुतीच्या हाती सत्तेची चावी

    Maharashtra Exit Poll Vidarbh Statistics: एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचे आकडेवारी सांगत आहे. पण विदर्भातील निकाल काय असणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम अखेर पार पडला आहे. महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक बहुचर्चित ठरली. राज्यातील २८८ मतदारसंघासाठी २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान पार पडले आहे. मतदानानंतर आता विविध एजन्सीचे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. यामध्ये राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचे आकडेवारी सांगत आहे. पण विदर्भातील निकाल काय असणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

    राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतच मुख्य लढत झाली आहे. महायुतीत भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांमध्ये अटीतटीचा सामना रंगला. ज्यामध्ये भाजपने १४९ निवडणूक लढवली, शिंदेंच्या शिवसेनेने ८१ जागांवर उमेदवार उतरवले तर अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून ५९ उमेदवार रिंगणात होते. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने १०१ जागांवर निवडणूक लढवली, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ९५ ठिकाणी निवडणूक लढवली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ८६ जागांवर आपले उमेदवार उतरवले होते.
    Maharashtra Exit Polls Highlights: महाराष्ट्रात पुन्हा भाजपच! एक्झिट पोलचे निकाल काय सांगतात? मविआला धक्का
    विदर्भात राज्याच्या सत्तेची चावी असते असे मानले जाते. राज्यातील अनेक दिग्गज नेते यंदाही विदर्भातून पुन्हा रिंगणात होते. या विदर्भात पुन्हा भाजपच किंग ठरणार असल्याचे एक्झिट पोलची आकडेवारी सांगते. JVC च्या एक्झिट पोलनुसार विदर्भात भाजपला २८-२६ जागा मिळतील असा अंदाज आहे. तर काँग्रेसला २१-३१ जागांवर फटका बसण्याची शक्यता आहे. तर Zeenia AI च्या अंदाजानुसार महायुतीला ३२-३७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला २४-२९ जागांवर बाजी मारता येणार आहे.

    विदर्भ हा नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय भवितव्य याच भागातून सुरु झाले आहे. कापूस पट्टा असलेल्या विदर्भात भाजपला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचे एक्झिट पोलचे अंदाज सांगतात.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed