• Sat. Mar 14th, 2026
    क्रिकेट खेळण्यावरुन वाद, दोन गटात तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू; ठाण्यात खळबळ

    ठाणे : भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील केजीएन चौक या ठिकाणी पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात एका गटाने केलेल्या चाकू हल्ल्यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट खेळण्याच्या वादातून नोव्हेंबरमध्ये दोन गटात हाणामारी होऊन गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्याचा राग मनात ठेवून एका गटाने धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात सातजण जखमी झाले असून त्यापैकी एकाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.यामुळे संपूर्ण भिवंडी पूर्व येथील शांतीनगर परिसरात तणाव निर्माण झाला असून घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे,शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड दाखल झाले असून परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
    महायुतीला पुन्हा धक्का, पत्ता कापण्याची भीती, शिंदेंचे खासदार गोडसेही ठाकरेंच्या संपर्कात?

    या हल्ल्यात जुबेर शोएब शेख (वय ४६), इस्तियाक शोएब शेख (वय ३२), अबू हमजा शेख, आसिफ वहाब शेख (वय ३६), साजिद वहाब शेख (वय ३३), शेहबाज सोहेल शेख (वय ३४), नोयेब सोहेल शेख हे गंभीर जखमी झाले असून यापैकी जुबेर शोएब शेख यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे .

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed