• Sat. Sep 21st, 2024
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

पैनगंगा नदी कोरडी, हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई

नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झालीय.पैनगंगा नदीच्या काठावर ही सर्व गावे आहेत.पैनगंगा नदी कोरडी पडल्याने हिमायतनगर तालुक्यातील जवळपास २५ गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.एकंबा गावासह आजूबाजूच्या गावांमध्ये पाण्याची टंचाई भासू लागलीय,पैनगंगा नदीकाठावरील या गावांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.पैनगंगा नदी कोरडी झाल्यामुळे बोर आणि विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट झालीय.शेती,जनावरांच्या आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.दरम्यान इसापूर धरणरून पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी या नदी काठच्या गावकऱ्यांनी केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed