• Sat. Sep 21st, 2024

राहुल गेले तिथेच काँग्रेस फुटली, भारत जोडो यात्रेवरुन फडणवीसांचा गांधींवर हल्लाबोल

राहुल गेले तिथेच काँग्रेस फुटली, भारत जोडो यात्रेवरुन फडणवीसांचा गांधींवर हल्लाबोल

म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: राहुल गांधी हे यात्रा घेऊन निघाले. ते जिथे-जिथे गेले, तिथे-तिथे काँग्रेस फुटली-तुटली. लोक सोडून गेले आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यंदाची लोकसभा निवडणूक म्हणजे नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा लढा आहे. ही निवडणूक देशात मोदींचे राज्य आणायचे की राहुल गांधींना संधी द्यायची याचा निर्णय करणारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी सोमारी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी चंद्रपूरच्या गांधी चौकात जाहीर सभा झाली. यावेळी फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, खासदार तथा वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस, आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार, आमदार अशोक उईके, आमदार संदीप धुर्वे, आमदार महेश बालादी, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार आशिष देशमुख, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगर अध्यक्ष राहुल पावडे, ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, माजी महापौर राखी कंचर्लावार, सुदर्शन निमकर यांच्यासह पक्षाचे इतर नेते, पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, देशाचा नेता कोण असेल, देशाचे नेतृत्व कुणाकडे द्यायचे याचा निर्णय प्रत्येकाला करायचा आहे. मुनगंटीवार यांना दिलेले प्रत्येक मत हे मोदींना दिले असणार आहे. मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या सर्वंकष विकासासोबत राज्यातील महत्त्वाचे नेते म्हणून अनेक मुद्द्यांनाही हात घातला आहे. त्यामुळेच महायुतीच्या उमेदवारांचे नामांकन दाखल करण्यास चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुरुवात होत होत असल्याचेही सांगितले.

नवनीत राणांना तिकीट दिलं, तर महायुतीबाहेर पडण्याची परवानगी द्या, बच्चू कडूंचा शिंदेंना इशारा

‘त्यांच्याकडून ओबीसींचा अपमान’

काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्रात आले असता त्यांनी ओबीसी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला. ते कधीही विकास करू शकणार नाहीत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

जाती-पातीच्या राजकारणावर टीका

निवडणूक आली की जातीच्या राजकारणाला उत येतो. सद्यःस्थितीत यावरून सामाजिक माध्यमांवर काही पोस्टदेखील व्हायरल होताना दिसतात. तेव्हा एका जातीच्या भरवशावर उमेदवार निवडून येऊ लागले तर साहजिकच ते त्या जातीच्या लोकांचीच कामे करतील. मग इतर जातीच्या लोकांनी जायचे कुठे, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला. काँग्रेच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना यानिमित्ताने टोला लगावला

महादेव जानकरांचा धक्का; शरद पवारांना साथ देण्याची भाषा अन् २४ तासांत देवेंद्र फडणवीसांशी युतीची गाठ

शक्तिप्रदर्शन करीत नेतेंनी भरला अर्ज

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी रॅली काढण्यात आली. अभिनव लॉनमध्ये सभाही झाली. सभेला माजी राज्यमंत्री अंबरीश आत्राम, भाजपचे ज्येष्ठ नेते अरविंद पोरेड्डीवार आणि महायुतीचे इतरनेते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed