• Sun. Sep 22nd, 2024

राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे : जिल्हाधिकारी

ByMH LIVE NEWS

Mar 17, 2024
राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे : जिल्हाधिकारी

        बीडदि. 17 मार्च (जिमाका) :-(जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात ३९-बीड लोकसभा मतदार संघात आदर्श आचार संहिता लागू झाली असून राजकीय पक्षांनी आणि प्रतिनिधीनी त्याच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीची वेठक झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कविता जाधव निवडणूक उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी अंजू निमसरकर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करतांना उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात ५ प्रतिनिधीनां प्रवेश देण्यात येईल यासाठी सोबत अणावयाची वाहने, आदीप्रसंगी आचार संहितेनुसार बंधने पाळली जावीत. राजकीय पक्षाशी निगडित विविध मंजुरी एक खिडकी मधून दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यासह राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टीका त्यांची धोरणे कार्यक्रम पूर्वीची कामगिरी आणि कार्य यांच्याशी संबंधित असावी. शांततापूर्ण आणि उपद्रव रहित जीवन जगण्याचा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे त्या अधिकाराचे निवडणुकीच्या काळात पण जतन व्हावे अशी अपेक्षा जिल्हाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केली. सभेसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टींची पूर्वपरवानगी घेण्यात यावी. सभांमध्ये सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी पोलीस बंदोबस्तची मदत घ्यावी.

मतदानाच्या दिवशी उमेदवार व त्यांची निवडणूक मतदान प्रतिनिधी याव्यतिरिक्त फक्त निवडणूक आयोगाकडून वैद्य प्राधिकार पत्र मिळालेल्या व्यक्तींनाच कोणत्याही मतदान कक्षा प्रवेश करता येईल इतर व्यक्ती कोणीही उच्चपदस्थ असली तरी तिला अटीतून सूट मिळणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यातील काही शासकीय इमारतीचे बांधकाम होत असल्यामुळे लगतच्या चंपावती शाळेत निवडणुकीशी निगडित कार्यक्रम होतील याची माहिती पण जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.

बीड जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात 13 मे ला निवडणूक होणार असून हा काळ विद्यार्थ्यांसाठी सुट्ट्यांचा असतो त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक लोकांनी आणि विशेषतः तरुणांनी भाग घ्यावा असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

यावेळी भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सोयी सुविधेबाबतचीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली या अंतर्गत दिव्यांगांसाठी तसेच 80 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींसाठी घरपोच मतदानाची सुविधा उपलब्ध असेल. मतदान केंद्रावर व्हीलचेअरसह मूलभूत सुविधा असतील याबाबतही सांगितले. यावेळी दिव्यांग बूथ तसेच महिलांचे बूथ तयार केले जातील. मात्र अधिकाधिक मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे आणि इतरांनाही प्रोत्साहन करावे यासाठी राजकीय पक्षांनी त्याप्रमाणे प्रचार प्रसार करावा अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केल्या.

काही मतदाराचे दोन ठिकाणी नावे असतात, अशा मतदारांनी कुठल्याही एका ठिकाणी नाव नोंदवावे यासाठी राजकीय पक्षांनीही याबाबत मतदारांना जागृत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री ठाकूर यांनी मतदारसंघात स्टार प्रचारकांच्या प्रचार सभा, प्रचार आदीवेळी कायदा व सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे सांगितले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सोळंके यांनी निवडणूक काळात भरारी पथके, निगराणी पथके कार्यरत असून आचार संहिता भंगाच्या तक्रारीचा तातडीने दखल घेण्यात येईल असे सांगितले.

याप्रसंगी निवडणुकीची तयारी, निवडणूक कार्यक्रमाचा दिनांक देऊन प्रचार व प्रसिध्दीसाठी सार्वजनिक मालमत्तेच्या विदुपीकरणापासून संरक्षण आदीसाठी नियम यांची माहिती दिली. तसेच आदर्श आचार संहिता मार्गदर्शक तत्वांच्या माहिती देण्यात आल्या. बैठकीसाठी आम आदमी पक्ष, शिवसेना शिंदे गट तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गट, एम आय एम, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कांग्रेस, बहुजन समाजवादी पक्ष, कम्युनिष्ट पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट, आदी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राजकीय पक्षांना निवडणुकीशी संबंधित माहिती पुस्तिका देण्यात आली.

 

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed