• Sat. Mar 14th, 2026
    गिरीश महाजनला हिसका दाखवतो, त्याच्या मतदारसंघात ३४ टक्के कुणबी मराठा, जरांगेंचं ओपन चॅलेंज

    धनाजी चव्हाण
    परभणी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाज म्हणून विरोध संपला, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी वाशीच्या सभेतून केली आणि दीड महिन्यातच त्यांनी समाजाची फसवणूक केल्याचं सांगत निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्याविरोधात मोर्चा उघडला. दुसरीकडे उपोषण काळात सरकारचे दूत असलेले गिरीश महाजन यांनाही जरांगे यांनी खुलं आव्हान दिलंय. तुमच्या मतदारसंघात ३३ टक्के कुणबी मराठा आहेत. त्यांना हिसका दाखवतो, असे सांगताना फडणवीस यांच्या विश्वासू सहकाऱ्याविरोधात देखील दंड थोपटले. एकंदर लोकसभेआधी महायुतीमधील घटकपक्षांना लक्ष्य करीत मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली आहे.
    काल आमदाराचं आऊटगोईंग आज नेत्यांचं इनकमिंग, भाजपच्या ललिता पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत, लोकसभेबाबत म्हणाल्या…
    मनोज जरांगी कालपासून दोन दिवसांच्या परभणी दौऱ्यावर होते. रविवारी मानवत आज सकाळी पोखरणी, लिमला, परभणी आणि झिरो फाटा या पाच ठिकाणी त्यांनी संवाद बैठका घेतल्या. यावेळी परभणीतील संवाद बैठकीत बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मनोज जरांगेंनी गिरीश महाजनांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच त्यांनी उघडपणे आव्हान दिले आहे. अंतरवालीमध्ये मनोज जरांगेंचे आंदोलन सुरू होते. त्यावेळी गिरीश महाजनांनी सरकारचे दूत बनून जरांगेंजवळ चर्चा केली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेवरुन जरांगेंनी आता महाजनांची चांगलीच कानउघडणी केली आहे.गिरीश महाजनांवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, महाजन म्हणतात मी त्यांचे लाड पुरवले. महाजनांनी माझे काय लाड पुरवले? मला आज त्यांच्या मतदारसंघातून फोन येत आहेत. तुम्ही सांगा काय करायचं. त्यांच्या मतदारसंघात ३४% कुणबी मराठा आहेत. मी आता त्यांना माझा हिसका दाखवणार आहे, अशा शब्दात जरांगे गिरीश महाजनांचा चांगलाच समाचार घेतला. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा शिंदे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना लक्ष केले आहे. जरांगेंनी आता थेट मुख्यमंत्र्यांनी मराठा बांधवांचा विश्वास गमावल्याचा दावा करत शिंदेवर टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर समाजाचा खूप विश्वास होता. मात्र वेळ देऊन देऊन त्यांनीही तो विश्वास आता गमावला, असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं.

    निलेश लंकेंची घरवापसी?, पवार म्हणाले, अनेक लोक आमच्या पक्षात येण्यास इच्छूक आहेत, अनेकांची चर्चा!

    ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी फक्त ८ दिवस उपोषण करून दाखवावे. त्यांची कधी अन् कुठून हवा जाईल, हे त्यांना कळणार ही नाही. तसेच तुमची ढेरीही कमी होईल. मी त्या परिस्थितीत बोललेलं दिसलं, मात्र आमच्या आया बहिणींवर हल्ला करताना त्यांना काही वाटले नाहीं का? असा संतप्त सवाल मनोज जरांगेंनी फडणवीस यांना केला आहे. जरांगे म्हणाले की, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्यावर हल्ला केला, त्यांना बढती दिली. तसेच हा सरकारचा न्याय असल्याचे जरांगेंनी म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही धारेवर धरलं आहे. जरांगे म्हणाले, एकनाथ शिंदेंवर समाजाचा विश्वास होता. मात्र वेळ देऊन त्यांनीही तो विश्वास आता गमावला. परभणीत आयोजित संवाद बैठकीदरम्यान मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed