• Sat. Sep 21st, 2024

अनिल दवे हॉस्पिटलमधून आले, म्हणाले अंतिम निर्णय आजच, कोस्टल रोडला मान्यता अन् १५ दिवसात निधन

अनिल दवे हॉस्पिटलमधून आले, म्हणाले अंतिम निर्णय आजच, कोस्टल रोडला मान्यता अन् १५ दिवसात निधन

मुंबई : मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या सागरी किनारा मार्गाची (कोस्टल रोड) वरळी-मरिन ड्राइव्ह ही एक मार्गिका खुली करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी फडणवीसांनी कोस्टल रोडच्या बांधकामाचा प्रवास उलगडला. तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल दवे यांनी परवानगी दिली आणि १५ दिवसांतच त्यांची प्राणज्योत मालवली, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी स्मरण केलं. तर श्रेय घेतल्याचा आरोप केल्यावरुन आदित्य ठाकरेंचा फडणवीसांनी समाचार घेतला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

काल मला इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर पाहायला मिळालं की उबाठाचे जे बाळराजे आहेत त्यांनी सांगितलं की हे सगळं आम्ही केलं आणि याचं श्रेय ते घेत आहेत. पहिल्यांदा मी सांगू इच्छितो, की आम्ही दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेणारे नाही आहोत. जे आम्ही करतो, त्याचंच श्रेय घेतो. कोस्टल रोडची संकल्पना नवीन नव्हती. उद्धवजींनी तर दोन महापालिका निवडणुका कोस्टल रोडच्या प्रेझेंटेशन दाखवूनच पार पाडल्या, पण कोस्टल रोड कधी झालाच नाही, असं फडणवीस सांगत होते.

२००४ ते २०१४ – केंद्रात यूपीए सरकार होतं.. त्यावेळी सर्वात मोठा प्रॉब्लेम काय होता.. तर आपल्या नियमात सी लिंक बांधण्याची परवानगी होती, पण कोस्टल रोडला नव्हती.. कारण त्या ठिकाणी रेक्लमेशन करावं लागतं आणि त्यामुळे सीआरझेडची लाईन बदलते. अनेक सन्माननीय मुख्यमंत्री.. विशेषतः यूपीएचे महाराष्ट्रातले शेवटचे मुख्यमंत्री.. त्यांना कोस्टल रोडला ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणत दिल्लीला जाताना मी पाहिलं आहे.. पण ते दिल्लीला जायचे, आणि हात हलवत परत यायचे, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शाहू महाराज छत्रपतींविरोधात भाजपची मोठी खेळी, ‘या’ तोडीस तोड उमेदवाराला तिकीट देण्याची चर्चा
२०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार आणि पुढे राज्यात महायुती सरकार आलं, आम्ही या प्रवासाला सुरुवात केली. केंद्रासोबत पाच बैठका, प्रत्येक वेळी त्यावर सोल्युशन निघालं, ते म्हणाले की रेक्लमेशनला आम्ही परवानगी देऊ, त्यासाठी सीआरझेडची लाईन बदलणार नाही, असं अंडरटेकिंग द्यावं लागलं. यामुळे २०० एकर स्पेस तयार होते, तिथे आम्ही रिअल इस्टेट तयार करु आणि पर्यायाने सस्टेनेबिलिटी घालवली जाईल, मोठ्या प्रमाणात बिल्डिंग तयार होतील, अशा भीतीमुळे परवानगी मिळत नव्हती. मात्र या जमिनींवर उद्यानं, मैदानं या व्यतिरिक्त एकही बांधकाम करणार नाही, असं आम्ही सांगितल्याचं फडणवीस म्हणाले.
पुण्याच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीस विरुद्ध तावडे सुप्त संघर्षाची शक्यता
केंद्रात सगळेच काही हुशार नसतात, तिथल्या एका अॅडिशनल सेक्रेटरीने सांगितलं, की इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट चाललं पाहिजे, आम्ही म्हटलं ठीक आहे, तर ते म्हणाले की यावर ट्राम चालली पाहिजे. मी म्हटलं, ट्राम कुठल्या जमान्यातली? हे मोदी सरकार आहे, आधुनिक सरकार आहे, अखेर ती अट वगळली. डॉ. संजय मुखर्जी आणि प्रवीण परदेशी यांनी प्रॉब्लेममधून सातत्याने मार्ग काढले, त्याबद्दल आभार. एका बैठकीत मी नाराज झालो, मोदीजींकडे तक्रार करतो, तुमच्या सरकारप्रमाणे इथलं काम चालत नाही, मी एक मुख्यमंत्री दीड वर्ष चकरा मारतोय, पण रोज नवे अडथळे येतायत, असं मी संबंधित विभागाला सांगितलं.

गाढवाला चंदन लावलं तरी ते उकिरड्यावर जाऊन अंगाला राख लावणारच, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

स्वर्गीय अनिल माधव दवे, त्यावेळचे पर्यावरण मंत्री.. मला माहिती नव्हतं, ते आजारी होते.. आम्ही शेवटची बैठक लावली, हॉस्पिटलमधून ते आले.. म्हणाले, नथिंग डूईंग… आज अंतिम निर्णय होईल, आजच याला मान्यता द्यायची. मुख्यमंत्री, तुम्ही पोहोचेपर्यंत पुढच्या दोन दिवसात फायनल नोटिफिकेशन देतो. अनिल माधव दवे यांनी फायनल नोटिफिकेशन काढलं आणि १५ ते २० दिवसात ते आपल्यात नव्हते. त्यांचं निधन, त्यांची आठवण आज करणं गरजेचं आहे, असं फडणवीसांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed