• Thu. Mar 19th, 2026

    … तेव्हापासून ताईंचे मानसिक संतुलन बिघडले; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर घणाघाती आरोप

    … तेव्हापासून ताईंचे मानसिक संतुलन बिघडले; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर घणाघाती आरोप

    सातारा : जेव्हापासून सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, हे माहिती झाले, तेव्हापासून राज्यातील मोठ्या ताईंचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे त्या वाटेल ते वक्तव्य करत असतात. २०१४ पासून आजपर्यंत या देशातील महिलांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी तिच्या जन्मापासून ते सरणापर्यंत मोदीजी तिच्यासोबत उभे राहिले आहेत. आपल्या मोठ्या ताई या सुद्धा मोदीजींच्या लाभार्थी आहेत. त्यांनी कोरोनाचे वॅक्सिन घेतले नसते तर काय झाले असते. म्हणजे मोदीजींनी आपल्या विरोधकांनाही जीवनदान दिले आहे. लस घ्या आणि माझ्यावर टीका करा. हे काम आपल्या मोठ्या ताई करताहेत.

    जेव्हापासून सुमित्राताई बारामतीची निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केल्यापासून मोठ्या ताई हलल्या आहेत. त्याच्यातून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ते असे वक्तव्य करत आहेत, घणाघाती आरोप भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केला. सातारा येथे भाजप महिला मोर्चाच्या वतीने महिला दिनानिमित्त ‘महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आली होते. या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर टीका केली.

    एक बहीण म्हणून जी इच्छा आहे, ती माझी इच्छा आहे, म्हणून येथील प्रत्येक ताईचे जी इच्छा आहे. आणि ती इच्छा व्यक्त करणे हे आमच्या बहिणींचा धर्म आहे. तो आम्ही तो करतोय. आमच्या नेत्यांपर्यंत सर्व बहिणींचे विचार आहेत ते कार्यकर्ता म्हणून पोहोचवने हे आमचे काम आहे, धर्म आहे. आमचे नेते देवेंद्रजी व बावनकुळे हे सकारात्मक विचार करतील, अशी आशा वाघ यांनी व्यक्त केली.

    आगामी लोकसभेमध्ये महिलांना किती जागा सोडण्यात येतील या प्रश्नावर बोलताना चित्राताई वाघ म्हणाल्या, आजच्या तारखेला विधान परिषद, विधानसभेमध्ये सर्वात जास्त महिला कोणत्या पक्षाच्या असतील तर त्या भाजपच्या आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळ्या पक्षांनी पुरुषांना एकमेव संधी दिली.पण असा एक भाजप पक्ष आहे की त्यांनी महिलेला संधी दिली.त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा महिलांना प्राधान्य दिले जाईल. इतके वर्ष लोकसभा,विधानसभेत महिलांना आरक्षण देऊन फक्त फक्त वलग्ना विरोधकांनी केल्या, पण त्या प्रत्यक्ष मोदींनी प्रत्यक्षात आणून दाखवला.

    महिला मेळाव्याबाबत विचारले असता, चित्राताई वाघ म्हणाल्या, मेळावा अप्रतिम झाला. उदयनराजे यांनी या ठिकाणी महिला मेळाव्याचे आयोजन केले, पण ते आज या ठिकाणी उपस्थित नाहीत. आज उदयनराजे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला आमच्या पक्षाचे सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. मला वाटते हा मोठा दुग्धशर्करासारखे योग आहे. उदयनराजे भोसले या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. महाराजांच्या या कार्यक्रमांमध्ये मोठ्या भावाची जी कमी होती ती छोट्या भावाने त्या ठिकाणी भरून काढली, याचा मला मनापासून आनंद झालेला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed