• Mon. Mar 16th, 2026

    विश्वास ठेवून गाडीत बसला अन् तिथेच फसला, जीवाभावाच्या मित्रांच्या मैत्रीचा हादरवणारा अंत

    विश्वास ठेवून गाडीत बसला अन् तिथेच फसला, जीवाभावाच्या मित्रांच्या मैत्रीचा हादरवणारा अंत

    नागपूर: उपराजधानीत खुनाचे सत्र सुरूच असून नगपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत गुरुवारी प्रेमप्रकरणातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. रवी सावा (२६, रा. इंदोरा) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणात आवेश मिर्झा बेग, कुणाल खडतकर आणि आयुष पेठे या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे

    याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती नुसार गुरुवारी सकाळी पांढुर्णा गावच्या पोलिस पाटील यांना एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाची तपासणी केली असता तरुणाच्या खिशात एक मोबाईल आढळून आला ज्यामध्ये रवी सावा असे त्याचे नाव असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवला.

    तपासादरम्यान, मृतक तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तरुणीचे आरोपी आवेशशी बोलणे आणि भेटीगाठी सुरू झाल्या. त्यामुळे रवी आणि आरोपी आवेश यांच्यात अनेकदा वाद झाले. बुधवारी रवीने आवेशला फोन करून भेटण्यास सांगितले. आरोपी त्याच्या दोन मित्रांसह भेटायला आला होता. यावेळी आरोपीचे दोन मित्रही उपस्थित होते. आरोपींनी रवीला गाडीत बसवून आऊटर रिंगरोडच्या दिशेने नेले.

    दरम्यान, आरोपींनी चाकू काढून रवीवर हल्ला करण्यास सुरुवात केली. आरोपीने त्याच्यावर २५ हून अधिक वार केले, त्यामुळे रवीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी मृतदेह पांढुर्णा गावात टाकून तेथून पळ काढला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed