• Sat. Sep 21st, 2024

बारावीचे पेपर संपण्याआधी बापाने लेकीला संपवलं, तिहेरी हत्याकांडाने चंद्रपूर हादरलं, कारण काय?

बारावीचे पेपर संपण्याआधी बापाने लेकीला संपवलं, तिहेरी हत्याकांडाने चंद्रपूर हादरलं, कारण काय?

चंद्रपूर: गाढ झोपेत असलेल्या दोन मुली आणि पत्नीला कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना जिल्हातील नागभिड तालुक्यात येणाऱ्या मौशी गावात घडली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अल्का तलमले (वय ४०), तेजू तलमले, प्रणाली तलमले अशी मृतकांची नावे आहेत. आरोपी अंबादास तलमले (वय ५०) याला पोलिसांनी अटक केली आहे. हत्याकांडाचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मौशी गावातील आरोपी अंबादास तलमले हे आपल्या दोन मुली, एक मुलगा, पत्नी यांच्यासोबत वास्तव्य करीत होते. काही महिन्यापासून घरात कौटुंबिक कलह सुरू असल्याने ही घटना घडल्याचं परिसरात बोललं जात आहे. शनिवारच्या रात्री मुलगा बाहेर गेला होता. दोन मुली, पत्नी गाढ झोपेत होत्या, तेव्हा अंबादास तलमले याने कुऱ्हाडीने तिघांवर सपासप वार केलेत.

यात पत्नी अलका, मुलगी तेजू आणि प्रणाली या तिघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिस घटनास्थळी पोहोचत आरोपीला अटक केली. या तिहेरी हत्याकांडाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येचं कारण अद्याप पुढे आलेले नाही. जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन हे घटनास्थळी पोहोचले. पुढील तपास नागभीड पोलिस करीत आहेत.

बारावीचे पेपर संपण्याआधी जीवन संपलं

लहान मुलगी तेजू तलमले ही इयत्ता बारावीची विद्यार्थिनी आहे. सध्या बारावीचे पेपर सुरु आहेत. बारावीत चांगल्या गुणांसहित उत्तीर्ण होण्याचं तिचं स्वप्न होतं. मात्र डोक्यात शैतान शिरलेल्या तिच्या वडिलांने तिच्या स्वप्नांच्या चुराडा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed