• Sat. Sep 21st, 2024
कारागृहात क्षमतेच्या दीडपटीने कैदी; राज्यात १४ नवीन कारागृहे

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

राज्यात सुमारे ६० कारागृहे असून गुन्हेगारांची वाढती संख्या पाहता ही कारागृहे अपुरी पडत आहेत. राज्य सरकराने आणखी १४ नवीन कारागृहे उभारणार असल्याची माहिती न्यायालयात दिली आहे. सध्याच्या कारागृहांमध्ये दुरुस्ती करून जागा वाढविण्यास नुकतीच मंजुरी देण्यात आली. राज्यात एकूण ६० कारागृहे असून त्यामध्ये २६ हजार ३७७ कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र प्रत्यक्षात तेथे ४०,४८५ म्हणजेच सुमारे १५३ टक्के अधिक कैदी आहेत. राज्यातील गुन्हेगारांची संख्या, त्या तुलनेत कारागृहाची क्षमता याचा आढावा.

कारागृहाचे प्रकार संख्या

मध्यवर्ती कारागृह ९
जिल्हा कारागृह २८
विशेष कारागृह रत्नागिरी १
मुंबई महिला कारागृह १
किशोर सुधारालय नाशिक १
खुले कारागृह १९
खुली वसाहत, आटपाडी १
एकूण ६०

कारागृहांची एकूण कैदीक्षमता २६,३७७
प्रत्यक्षातील कैद्यांची संख्या ४०,४८५
क्षमतेपेक्षा अधिक कैदी १५३ टक्के

कैद्यांचे प्रकार आणि संख्या
प्रकार पुरुष स्त्री तृतीयपंथी एकूण
दोष सिद्ध झालेले ७६०१ २४९ ०० ७८५०
न्यायधीन कैदी ३०८४१ १३५२ २२ ३२२१५
इतर कैदी ४१५ ५ ० ४२०

कारागृहे क्षमता प्रत्यक्ष कैदी टक्केवारी
अमरावती ९३९ १३२४ १३६
नागपूर १९४० २८८४ १४९
औरंगाबाद १२१४ १६३६ १३५
नाशिक रोड ३२०८ २६०२ ८१
कोल्हापूर १७५५ २००७ ११२
येरवडा २५२६ ६५२५ २३७
मुंबई ९९९ ३७२२ ३७३
ठाणे १०८६ ४१८४ ३७७
तळोजा २१२४ २९१६ १३७

जिल्हा कारागृह
कारागृह क्षमता प्रत्यक्ष कैदी टक्केवारी
भायखळा २०० ३७८ १८९
कल्याण ५४० २१९१ ४०६
अलिबाग ८२ १६१ १९६
सावंतवाडी ७८ ४२ ५४
सिंधुदुर्ग १२० ७१ ५९
जे. जे. रुग्णालय २० ६ ३०

कारागृह क्षमता प्रत्यक्ष कैदी टक्केवारी

रत्नागिरी विशेष २४६ २१४ ८७
मुंबई महिला २६२ ३७३ १४२
किशोर सुधारालय १०५ ७ ७
खुले कारागृह (१९) २५०० १७९९ ७२
खुली वसाहत २८ १३ ४६

क्षमतेच्या दुपटीपेक्षा अधिक कैदी असलेली कारागृहे
कारागृह क्षमता प्रत्यक्ष कैदी टक्केवारी

कल्याण जिल्हा ५४० २१९१ ४०६
ठाणे मध्यवर्ती १०८६ ४१८४ ३७७
मुंबई मध्यवर्ती ९९९ ३७२२ ३७३
बुलढाणा जिल्हा १०१ ३५४ ३५०
सोलापूर जिल्हा १४१ ४६२ ३२८
नांदेड जिल्हा २०४ ६०१ २९५
जळगाव जिल्हा २०० ५२० २६०
येरवडा मध्यवर्ती २७५२ ६५२५ २३७

… म्हणून वाढतोय ताण
एका बाजूला गुन्हे आणि गुन्हेगारांची संख्या वाढत आहे दुसरीकडे न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान जामीन मिळत नसल्याने न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले कैदी अनेक वर्षे कारागृहात राहतात. जामीन करण्यासाठी कुणी पुढे येत नाही, कुणी नातेवाईक असला तरी आर्थिक परिस्थिती बेताची असते, अशा अनेक अडचणीमुळे न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत कैद्यांना तुरुंगातच राहावे लागते. न्यायालयात खटला अनेक वर्षे चालत असल्यामुळे त्याचाही फटका तुरुंगातील कैदी संख्येवर होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed