• Sat. Sep 21st, 2024

अजितदादा म्हणतील PMC कशाला, खातंच द्या; पण ते देणार नाही, माझ्याकडेच ठेवेन, फडणवीसांची कोपरखळी

अजितदादा म्हणतील PMC कशाला, खातंच द्या; पण ते देणार नाही, माझ्याकडेच ठेवेन, फडणवीसांची कोपरखळी

बारामती : बारामतीत आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित नमो महारोजगार मेळावा पार पडत आहे. यावेळी मंचावरुन संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोपरखळी मारली. “अजितदादा मला हळूच म्हणू शकतात, की पीएमसीच (प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट) का, खातंच माझ्याकडे द्या, पण ते देणार नाही, ते माझ्याकडेच ठेवेन” असं देवेंद्र फडणवीस म्हणताच मंचावर हशा पिकला.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

बारामतीतील अद्ययावत बसस्थानक, बारामतीतील बऱ्हाणपुर येथील पोलीस उप मुख्यालय आणि बारामती शहरातील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय व शहर पोलीस स्टेशनच्या इमारतीचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, की “आता लोक माझ्या मागे लागतील, की माझं पोस्टिंग बारामतीलाच करा. कारण एवढं चांगलं कार्यालय आणि एवढं चांगलं निवासस्थान बारामतीलाच उपलब्ध आहे. मी दादा तुम्हाला विनंती करु इच्छितो, तुम्ही स्वतः लक्ष घालून इतक्या चांगल्या इमारती बांधल्यात, मला तर आता मोह होतोय, की आपल्या पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत, त्याचा पीएमसी म्हणून तुम्हाला नियुक्त करावं, म्हणजे सगळ्या इमारती चांगल्या होतील. अर्थात दादा मला हळूच म्हणू शकतात, की पीएमसीच का, खातंच माझ्याकडे द्या.. पण ते देणार नाही, ते माझ्याकडेच ठेवेन, पण तुमची मदत मात्र सगळ्या चांगल्या इमारती बांधण्यासाठी घेईन.” असं फडणवीस म्हणाले.
सुनेत्रा पवार चुलत सासऱ्यांच्या कट्टर विरोधकाच्या भेटीला, सुळेंना पाडण्यासाठी काँग्रेसच्या ६ टर्म आमदाराची मदत?
नमो महारोजगार मेळाव्याला सरकारमधील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह शरद पवार, सुप्रिया सुळे यांचीही उपस्थिती होती. तसंच डॉ. नीलम गोऱ्हे, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत यांचीही मंचावर उपस्थिती पाहायला मिळाली. त्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, की नमो महारोजगार मेळावा घोषित झाल्यापासून माध्यमांना उद्योग मिळाला आहे. त्यामुळे दोन दिवसात याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. पण चांगलं काम करायचं असेल तर महाराष्ट्राची राजकीय संस्कृती हेच दाखवते, की आम्ही सगळे मिळून एकत्र काम करु शकतो.
नमो महारोजगार मेळाव्यात शरद पवारांची एन्ट्री, बारामतीकरांचा जल्लोष, अजितदादांचा चेहरा पडल्याची चर्चा
५५ हजार पदं अधिसूचित आहेत. उद्योगांना मानव संसाधनांची गरज असते. आम्हाला रोजगार हवाय, ही विद्यार्थ्यांची ओरड असते. आता रोजगार देणारे आणि घेणारे यांची एकत्र सांगड घातली गेली आहे. अजितदादांच्या पुढाकाराने पश्चिम महाराष्ट्रात नमो महारोजगार मेळावा चांगल्या पद्धतीने आयोजित केलाय, असं फडणवीस म्हणाले.

१५ वर्षांनी जनतेचा कौल बदलतो, यंदा सुनेत्रा वाहिनीच सर्वाधिक मतांनी निवडून येतील : रुपाली चाकणकर

Read Latest National News Updates And Marathi News

आम्ही कंत्राटी कामगार असतो, दर पाच वर्षांनी आम्हाला आमचं कंत्राट रिन्यू करावं लागतं, चांगलं काम नाही केलं तर लोक घरी बसवतात. पण आम्ही जो रोजगार देतोय, चांगलं काम केलंत, तर तुमची जन्मभर भरभराट होणार आहे. पहिल्यांदाच असं झालं की पदं अधिक म्हणजे ५५ हजार आणि अर्ज कमी – ३६ हजार इतकेच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था विस्तारित करत दहाव्या क्रमांकावरुन पाचव्यावर नेली, लवकरच तिसऱ्या नंबरवर न्यायची आहे. त्यासाठी प्रशिक्षित मानव संसाधनांची गरज आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed