• Sat. Sep 21st, 2024
उदयनराजेंसमोर लोकसभा उमेदवारीबाबत प्रश्न,फडणवीसांच्या उत्तरानं साताऱ्याचा सस्पेन्स कायम

सातारा : लोकसभा निवडणुकांची घोषणा येत्या काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ महायुतीत कुणाकडे जाणार, उमेदवार कोण असणार याबाबत अद्याप काही समोर आलेलं नाही. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर आज देवेंद्र फडणवीस साताऱ्यात होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. मात्र, लोकसभा निवडणुकीत साताऱ्याची जागा कुणाला जाणार, उमेदवार कोण असेल याबाबतचा सस्पेन्स कायम राहिला आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले, महायुतीचे जागावाटप सुरू आहे. कोण कोणत्या जागा लढणार याबाबत चर्चेची प्राथमिक फेरी झालेली आहे. अजून एक-दोन फेऱ्या झाल्यानंतर जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. यानंतर कोणत्या जागा लढवायचे एकदा ठरले की मग उमेदवारीबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. कोणाला उमेदवारी द्यायची, हे योग्य वेळी सांगण्यात येईल. कुणाला उमेदवारी द्यायची ही वरिष्ठ पातळीवरील बाब आहे. माझ्या सारख्या नेत्यांनी अटकळ बांधणे चुकीचे आहे, असे सांगत त्यांनी सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत असलेली उत्सुकता कायम ठेवली.

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांचा काल वाढदिवस साजरा झाला. याच वाढदिवसाच्या उचित साधून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे त्यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तर भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. खासदार उदयनराजे भोसले यांची देवेंद्र फडणवीस यांनी खास भेट घेतल्याने आगामी काळात सातारा लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजेच असतील, अशी चर्चा आता साताऱ्यात सुरू झाली आहे. मात्र, सातारा लोकसभा निवडणुकीबाबत सस्पेन्स अजूनही संपलेला नाही.

शरद पवार हे चाळीस वर्षांनंतर रायगडावर गेले. अजित पवार यांना या गोष्टीचे श्रेय द्यावे लागेल. त्यांनी शरद पवारांना रायगडावर पाठवले. त्यांना चाळीस वर्षानंतर का होईना त्यांना शिवरायांच्या चरणी नतमस्तक व्हावे लागले, याचा आनंद आहे, असं फडणवीस म्हणाले.
जे आयुष्यभर काँग्रेससोबत राहिले, त्यांनीच राज्यात काँग्रेसचा खासदार एकवर आणला, पटोले अशोक चव्हाणांवर बरसले
पुणे जिल्ह्यात अंमली पदार्थांचे रॅकेट संपवायचे असेल तर राजकीय हेवेदावे सोडून मदत करायची तयारी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केले आहे. याबाबत विचारले फडणवीस म्हणाले, याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. त्या मदत करत असतील तर स्वागतच आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News

बावनकुळे यांनी गावा-गावातील पक्ष संपवा, असे बावनकुळे कुठेही म्हटले आहे. त्यांनी जे पक्षात येतील, त्यांना पक्षात घ्या, असे सांगितल्याचं म्हणत फडणवीसांनी त्यांचं समर्थन केलं.
मी काही ऐकलंच नाही काय आरोप केलेत, देवेंद्र फडणवीस यांची मनोज जरांगेंच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया
शरद पवार यांनी देशाची परिस्थिती बिकट असून परिवर्तनाची गरज असल्याच्या वक्तव्याचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, देशाची नव्हे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची परिस्थिती बिकट आहे. त्यांनी योग्य वेळी परिवर्तन केले असते तर अशी त्यांची अशी बिकट परिस्थिती झाली नसती, असंही फडणवीस यांनी म्हटलं.
सातारा लोकसभा लढणार का? पत्रकारांचा प्रश्न; उदयनराजे म्हणतात, प्रत्येकाची इच्छा असते, मी अपवाद नाही
विरोधकांचा ईव्हीएम मशीनला आक्षेप असल्याबात फडणवीस म्हणाले, ते जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली असते व हारतात तेव्हा ईव्हीएम मशीन खराब असते. निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवण्याचे आव्हान दिले होते. परंतु, कुणीही ते स्वीकारले नाही. हरायची मानसिकता झाली की ईव्हीएम मशीन आठवते, असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed