भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांचा काल वाढदिवस साजरा झाला. याच वाढदिवसाच्या उचित साधून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे त्यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तर भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. खासदार उदयनराजे भोसले यांची देवेंद्र फडणवीस यांनी खास भेट घेतल्याने आगामी काळात सातारा लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजेच असतील, अशी चर्चा आता साताऱ्यात सुरू झाली आहे. मात्र, सातारा लोकसभा निवडणुकीबाबत सस्पेन्स अजूनही संपलेला नाही.
शरद पवार हे चाळीस वर्षांनंतर रायगडावर गेले. अजित पवार यांना या गोष्टीचे श्रेय द्यावे लागेल. त्यांनी शरद पवारांना रायगडावर पाठवले. त्यांना चाळीस वर्षानंतर का होईना त्यांना शिवरायांच्या चरणी नतमस्तक व्हावे लागले, याचा आनंद आहे, असं फडणवीस म्हणाले.
पुणे जिल्ह्यात अंमली पदार्थांचे रॅकेट संपवायचे असेल तर राजकीय हेवेदावे सोडून मदत करायची तयारी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केले आहे. याबाबत विचारले फडणवीस म्हणाले, याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. त्या मदत करत असतील तर स्वागतच आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News
बावनकुळे यांनी गावा-गावातील पक्ष संपवा, असे बावनकुळे कुठेही म्हटले आहे. त्यांनी जे पक्षात येतील, त्यांना पक्षात घ्या, असे सांगितल्याचं म्हणत फडणवीसांनी त्यांचं समर्थन केलं.
शरद पवार यांनी देशाची परिस्थिती बिकट असून परिवर्तनाची गरज असल्याच्या वक्तव्याचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, देशाची नव्हे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची परिस्थिती बिकट आहे. त्यांनी योग्य वेळी परिवर्तन केले असते तर अशी त्यांची अशी बिकट परिस्थिती झाली नसती, असंही फडणवीस यांनी म्हटलं.
विरोधकांचा ईव्हीएम मशीनला आक्षेप असल्याबात फडणवीस म्हणाले, ते जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली असते व हारतात तेव्हा ईव्हीएम मशीन खराब असते. निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवण्याचे आव्हान दिले होते. परंतु, कुणीही ते स्वीकारले नाही. हरायची मानसिकता झाली की ईव्हीएम मशीन आठवते, असंही ते म्हणाले.