• Sat. Mar 14th, 2026

    मी काही ऐकलंच नाही काय आरोप केलेत, देवेंद्र फडणवीसांची जरांगेंच्या टीकेवर पहिली प्रतिक्रिया

    मी काही ऐकलंच नाही काय आरोप केलेत, देवेंद्र फडणवीसांची जरांगेंच्या टीकेवर पहिली प्रतिक्रिया

    सातारा : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सातारा येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनानिमित्त फडणवीस साताऱ्यात आहेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकेसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. मी काही ऐकलंच नाही, मी काही ऐकलंच नाही काय आरोप केलेत, तर काय बोलणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    देवेंद्र फडणवीस जरांगेंच्या आरोपावर काय म्हणाले?

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी काही ऐकलंच नाही, मी काही ऐकलंच नाही काय आरोप केलेत, तर काय बोलणार असं म्हणत अधिक भाष्य करणं टाळलं. साताऱ्यातील कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस या विषयावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागेल.
    सागर बंगल्यावर येतोय, माझा बळी घ्या, फडणवीसांवर हल्लाबोल करुन आक्रमक मनोज जरांगे मंचावरुन उठून चालू लागले

    प्रसाद लाड यांचा इशारा

    मनोज जरांगे यांनी त्यांची नौटंकी बंद करावी. समाजाच्या नावाखाली गेल्या सात आठ महिन्यात राजकीय वरदहस्त निर्माण करण्याचा प्रयत्न मनोज जरांगेंनी केला. मनोज जरांगेंच्या मागचा बोलवता धनी कोण आहे हे त्यांनी सांगावं. सिल्वर ओक आहे की जालन्यातील भैय्या फॅमिली आहे, असा सवाल प्रसाद लाड यांनी केला आहे. फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार आहेत. त्या फडणवीसांचं नाव तुम्हाला कोण घ्यायला लावतेय, असा सवाल देखील प्रसाद लाड यांनी केला.
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    मराठा समाजाला १० टक्क्यांचं आरक्षण मिळाल्यानंतर तुमची खेळी संपली आहे. समाजाच्या नाव घेणं बंद करा, १० टक्के मराठा आरक्षण मिळाल्यानं समाज खूश आहे. तुमचं लेकरं लेकरं म्हणनं बंद करा, असा इशारा देखील प्रसाद लाड यांनी दिला.
    Manoj Jarange: ही चाल फडणवीसांची, देवेंद्र फडणवीस तुम्हाला आयुष्यातून उठवेन, मनोज जरांगे आक्रमक
    भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील मनोज जरांगे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करु नये, असं राणे म्हणाले. मनोज जरांगे यांनी सागर बंगल्यावर यायचा इशारा दिल्यानंतर आम्हाला देखील भिंत म्हणून बाहेर उभं राहावं, लागेल, असं राणे म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed