• Thu. Mar 12th, 2026

    प्रदूषित झाली ‘चंद्रभागा’; नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात अळ्या, कीटक, जंतूचे साम्राज्य

    प्रदूषित झाली ‘चंद्रभागा’; नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात अळ्या, कीटक, जंतूचे साम्राज्य

    सोलापूर : माघी यात्रा तोंडावर आलेली असतानाच पंढरपुरात चंद्रभागेच्या प्रदूषणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. चंद्रभागेच्या पात्रात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असून, पाण्यात अनेक लहान-मोठे जंतू, कीटक, अळ्या झाल्या आहेत. या पाण्यात स्नान केल्यानंतर भाविकांच्या अंगाला खाज सुटत असून, विविध त्वचा विकार होत आहेत. ‘चंद्रभागेच्या पात्रात तातडीने स्वच्छ पाणी सोडावे; अन्यथा पालकमंत्र्यांना याच दूषित पाण्याने आंघोळ घालू,’ असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.

    गेल्या कित्येक वर्षांपासून चंद्रभागेच्या पात्रातून सातत्याते अवैध वाळूउपसा होत असल्यामुळे चंद्रभागेच्या पात्रात सर्वत्र खड्डे पडलेले आहेत. वाळूचोरांनी विष्णूपदानजीकच्या बंधाऱ्याची दारे काढल्यामुळे चंद्रभागेत उरलेले थोडेफार पाणीही वाहून गेले आहे. त्यामुळे चंद्रभागेत स्नानासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांची मोठी निराशा होत आहे. चंद्रभागेच्या पात्राची ही अवस्था पाहून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर वारकरी भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
    समुद्रातील मासे नदीत शिरण्याची भीती, बुल शार्क माशाच्या हल्ल्यानंतर तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरु
    वारकरी संप्रदायात चंद्रभागेच्या स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व असून, काही भाविक तीर्थ म्हणूनही येथील पाणी प्राशन करीत असतात. मात्र सध्या चंद्रभागेच्या पात्रात पाणीच राहिले नसल्याने सर्वत्र गाळ भरला आहे. ठिकठिकाणी कचरा, चिंध्या, निर्माल्य साठून राहिलेले असल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. या दुरवस्थेबाबत विविध आंदोलने करूनही याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. ‘चंद्रभागेची त्वरित स्वच्छता करून पात्रात पाणी सोडावे; अन्यथा भाविकांच्या हितासाठी आंदोलन करू,’ असा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed