• Mon. Mar 16th, 2026

    विदर्भाला अवकाळीचा तडाखा, गारपिटीमुळे यवतमाळमध्ये गहू- हरभऱ्याचे मोठं नुकसान;बळीराजा हवालदिल

    विदर्भाला अवकाळीचा तडाखा, गारपिटीमुळे यवतमाळमध्ये गहू- हरभऱ्याचे मोठं नुकसान;बळीराजा हवालदिल

    यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यात बाबुळगाव तालुक्यातील तालुक्यात खर्डा, येरणगाव, किन्ही-गोंधळी, गवंडी,विरखेड,वाटखेड, गोंधळी,घारपळ या गावांमध्ये गारपटीसह मुसळधार पाऊस झाला. काल सायंकाळच्या सुमारास गारपिटीचा तडाखा या परिसराला बसला. वादळीवाऱ्यासह गारपिटीमुळे शेतातील उभे असलेले गहू व हरभरा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

    येत्या काही दिवसात राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या अवकाळी पावसाच्या पुनश्च आगमनाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस विदर्भातील बहुतांश भागात तुरळक ते हलक्या स्वरूपात पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. पावसाच्या ढगांनी दाटी केल्याने विदर्भातील तापमानात घट झाली असून या पावसाचा संभाव्य धोका लक्षात घेता शेतकऱ्यांसह नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना देखील देण्यात आल्या होत्या.

    आमदार अन् मंत्री निगरगट्ट; आमच्याच पैशावर खाता, आम्हालाच वाऱ्यावर सोडता; अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल

    काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीचा फटका बसला. शेतशिवारातील उभे असलेले शेतपिक वादळीवारा व गारपिटीने जमीन दोस्त झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. संकटात सापडलेला शेतकरीवर्गांना दिलासा देण्यासाठी महसूल विभागाने सर्वे करून नुकसानाची माहीती शासनाला द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांकडून होत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed