• Sat. Sep 21st, 2024
शरद पवार नावाचा ८४ वर्षांचा योद्धा, हाच आमचा पक्ष आणि चिन्ह, जयंत पाटलांची भावनिक साद

अहमदनगर : गेल्या दीड वर्षांत दोन मोठे पक्ष फोडण्याचे काम या राज्यात घडले आहे. सरकारी यंत्रणांना हाताशी धरून राजकीय पक्षांवर दरोडे घालण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयाने आपला पक्ष आणि चिन्ह गेले असले तरी शरद पवार नावाचा आमचा ८४ वर्षांचा तरुण योद्धा आमच्या मागे खंबीरपणे उभा आहे. तोच आमचा पक्ष आणि तेच आमचं चिन्ह. त्यांचे विचार जन सामान्यात रुजविण्याचे काम करून महाराष्ट्राला मोठ्या जिद्दीने पुढे नेऊ, असे भावनिक आवाहन राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

कर्जत येथे राष्ट्रवादी विजय निश्चय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये पाटील बोलत होते. आमदार रोहित पवार, मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप वर्पे यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

पंडित नेहरूंचं योगदान विचारणाऱ्या मोदींना ठणकावलं, संसदेतील भाषणचा शरद पवारांकडून समाचार
पक्ष आणि चिन्हापेक्षा शरद पवार यांचा विचार महत्त्वाचा

पाटील म्हणाले, “दीड वर्षात दोन मोठे पक्ष फोडून लोकशाही धोक्यात आणली गेली. हा नवीन पायंडा राजकारणात पडत आहे. कार्यकर्त्यांचा नेता तुमच्या जीवावर मोठा होत असतो. न्यायालयीन लढाईत आपले पक्षाचे नाव आणि चिन्ह नक्की पुन्हा मिळवू. मात्र जे चिन्ह आणि पक्षाला नाव मिळेल ते जनतेमध्ये रुजविणे आपली जबाबदारी आहे. पक्ष किंवा चिन्हापेक्षा पवार यांचा विचार महत्त्वाचा आहे”.

काँग्रेस आरक्षणाची विरोधक, नेहरूंचा तर तीव्र विरोध होता, बाबासाहेबांचे विचार संपविण्याचं काम, मोदींचे गंभीर आरोप
राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतंय, कार्यकर्त्यांनो पाठिशी उभे राहा, विजय आपलाच

आता पोलीस ठाण्यात गोळीबार करून न्याय मिळवण्याचा नवीन प्रकार भाजपच्या या राज्यात सुरू झाला आहे. ज्याला गोळी मारली तो मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे. महाराष्ट्रात राजकारणात गुन्हेगारीकरण होत आहे. एका ज्येष्ठ मंत्र्याला एक आमदार कमरेत लाथ घालण्याची भाषा करतो. मात्र, त्याला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री साधा शब्द बोलत नाहीत. गुण्यागोविंदाने राहणाऱ्या दोन समाजात मनभेद करण्याचे पाप सरकार राजरोसपणे करीत आहे. सध्या राजकीय संकट आहे. मात्र पाठीशी उभे राहा आणि आगामी निवडणुकीत पक्षाचा विचार सर्वसामान्य जनतेच्या मनात रुजवावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी अजितदादांचीच! असिम सरोदे म्हणाले, बेकायदेशीरताच अस्तित्वात आहे, हे निर्णयातून सिद्ध झालं!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed