• Sat. Mar 7th, 2026
    येणाऱ्या निवडणुकीत सावंतवाडीत नरेंद्र मोदींचा झाडू घेऊन सुपडा साफ करायचा – उद्धव ठाकरे

    सिंधुदुर्ग: जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांचं सावंतवाडी येथे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. काही तरी करतील म्हणून दीपक केसरकर यांना मोठ्या अपेक्षेने मी शिवसेनेत घेतले. त्यांना मंत्रिपद दिले परंतु ते डबल गद्दार निघाले. आज ते सत्तेत असतील खुर्चीची उब त्यांना मिळेल. परंतु त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांना लागलेला गद्दारीचा डाग कधीही पुसला जाणार नाही. ते इमानदार होऊच शकत नाहीत, असा आरोप आज येथे आयोजित सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
    …आणि एका रात्रीत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसला, रामदास कदमांची जहरी टीका
    ते म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीत सावंतवाडीत पंतप्रधान मोदींचा झाडू घेऊन सुपडा साफ करायचा आहे. गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत आहात ना, अशी भावनिक साद त्यांनी यावेळी उपस्थित शिवसैनिकांना घातली. यावेळी उद्धवसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. संवाद यात्रेच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी सावंतवाडीतून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी गांधी चौकात आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना नेते भास्कर जाधव, गौरीशंकर खोत, सतिश सावंत, संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, बाबुराव धुरी, मंदार शिरसाट, अतुल रावराणे मायकल डिझोजा रुची राऊत, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी उपस्थितांना भावनिक साद घातली.

    उद्धव ठाकरे म्हणाले की, आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी मी पुन्हा येईनच. परंतु आज जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. या ठिकाणी मी मन की बात नाही तर दिल की बात ऐकवणार आहे. मनात काळे कपट असू शकते, पण हृदयात नाही. त्यामुळे आपण त्या पद्धतीने शिवसैनिकांशी संपर्क साधणार आहे. त्यामुळे एक कुटुंबप्रमुख म्हणून मी तुमच्यात आलो आहे. यावेळी त्यांनी मंत्री केसरकर यांच्यावर नाव न घेता भोचरी टीका केली. ते म्हणाले, ते डबल गद्दार आहेत. एक चांगला माणूस आणि आठवड्यातून पंधरावड्यातून शिर्डीला जात असल्यानेच एक चांगला माणूस म्हणून मी त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेतला. ते चांगले काम करतील असे वाटले म्हणून त्यांना मंत्रिपद दिले. परंतु त्यांच्याकडे श्रद्धाही नाही आणि सबुरी नाही. त्यांनी आजपर्यंत एकाही पक्षावर श्रद्धा दाखवली नाही. आपल्याला काहीतरी मिळेल यासाठी सबुरी बाळगली नाही.

    नवीन जॅकेट जुनी झाली तरी मंत्रीपद मिळेना, ठाकरेंनी भरत गोगावलेंच्या जखमेवर मीठ चोळलं

    ते म्हणाले की, भास्कर जाधव यांच्या सांगण्यानुसार ते तांदूळ वगैरे काहीतरी करतात. परंतु आपला त्याच्यावर विश्वास नाही. आपल्या स्वार्थासाठी ते इकडे तिकडे उड्या मारत आहेत. परंतु त्यांना आज सत्ता मिळाली असेल खुर्चीची उब मिळाली असेल. परंतु त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांवर असलेला बेईमानीचा डाग पुसला जाणार नाही. त्याचबरोबर केसरकर हे कोणाचेही होऊ शकत नाहीत. ते गद्दारच आहेत. कसं आहे बरं आहे याच्या पलीकडे ते काही करू शकत नाहीत, असाही टोला त्यांनी लगावला. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांचा सुपडा साफ करायचा आहे. त्यामुळे कामाला लागा, असे आवाहन करत कुडाळ मतदारसंघात वैभव नाईक यांनी तर लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांनी चांगली कामगिरी करून दृष्ट शक्तींना बाजूला ठेवण्याचे काम केले आहे. तसेच काम येथे करून शिवसैनिकांनी बेईमानांना जागा दाखवावी, असं वक्तव्य ठाकरे यांनी केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed