• Sat. Sep 21st, 2024

एकनाथ शिंदे हे कर्णासारखे दानशूर, कोणीही गेलं की १०० कोटी देऊन टाकतात: भावना गवळी

एकनाथ शिंदे हे कर्णासारखे दानशूर, कोणीही गेलं की १०० कोटी देऊन टाकतात: भावना गवळी

यवतमाळ/प्रतिनिधी: गेल्या काही दिवसांमध्ये आयकर खात्याच्या कारवाईमुळे शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी या अडचणीत सापडल्याची चर्चा आहे. आयकर खात्याने भावना गवळी यांच्याशी संबंधित महिला उत्कर्ष प्रतिष्ठान आणि भावना ॲग्रो अँड सर्व्हिसेस या संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला होता. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे बँक खाते गोठवण्यात आले होते. तर भावना ॲग्रो अँड सर्व्हिसेस कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भावना गवळी यांच्या अडचणी वाढल्या होत्या. आगामी लोकसभा निवडणुकीत वाशिम -यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून गवळी यांच्याऐवजी संजय राठोड यांना उमेदवारी मिळू शकते, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर भावना गवळी यांनी आक्रमक भूमिका घेत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघावर आपला दावा कायम असल्याचे संकेत दिले आहेत.

काल मी ताई होते, आज बाई झाले, उद्धव साहेबांच्या वक्तव्याने हृदय दुखलं : भावना गवळी

‘मेरी झांशी नहीं दुंगी’ असा नारा देत खासदार भावना गवळी यांनी पुन्हा एकदा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावर दावेदारी ठोकली आहे. महायुतीच्या समन्वय मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी महायुतीतील प्रतिस्पर्ध्यांना देखील साद घालीत भगिनी म्हणून बांधलेल्या पवित्र धाग्याची आठवण करून दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे बहीण म्हणून आपल्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे आमदार मदन येरावार देखील मला साथ देतील. लहान बहीण म्हणून पालकमंत्री संजय राठोडांना लोकसभा लढवायची असेल तर मला त्यांच्या विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी द्यावी अशीही मागणी त्यांनी केली. तर पुसदचे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी राज्यात एक लोकसभा मतदारसंघ बंजारा समाजासाठी सोडावा, असे सांगत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघावर अप्रत्यक्ष दावा ठोकला. त्यामुळे आजच्या महायुतीच्या मेळाव्यात यवतमाळ वाशीम जागेवरून दावे प्रतिदावे पाहायला मिळाले.

लोकसभेला कुठल्याही चिन्हावर लढा, तुमचं डिपॉझिट जप्त होणार, भावना गवळींना सेना नेत्याचं चॅलेंज

एकनाथ शिंदे ‘कर्ण’, अजितदादा ‘दबंग’, फडणवीस ‘चाणक्य’: भावना गवळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम पाहून अजित पवार हे महायुतीत सामील झाले. या देशातील राजकारणही दादांनी पाहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या राज्यातील त्रिमूर्ती आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्ण आहेत. कोणीही गेला, बच्चूभाऊ गेले, १०० कोटी मागितले तर देऊन टाकले. इकडे आठवले साहेबांनी काही मागितलं देऊन टाकलं. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांना ‘कर्ण’ या उपाधीने सन्मानित करते. हे सरकार तयार करण्यात आमचे चाणक्य असलेले देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे. तर अजित पवार हे या सरकारमधील दबंग आहेत, त्यांची दादागिरी सगळीकडे चालते. आपल्याला नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान बनवायचे आहे, असेही भावना गवळी यांनी म्हटले.

पुन्हा घातली राखीची आर्त साद

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खा. भावना गवळी यांची ‘राखी’ बहूचर्चित आहे. यापूर्वी त्या चारदा खासदार असतानाही त्या रक्षाबंधनाला मतदार राजा असो अथवा राजकीय नेत्यांना राखी पाठवायला विसरत नसतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मूळ शिवसेनेत असताना तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकीय नेत्यांना राखी बांधत ‘भैय्या राखी के बंधन को निभाना’, अशी अनेकदा आर्त साद घातली. या निवडणुकीतही त्यांचा तोच कित्ता असल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. इंद्रनील नाईक यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघावर बंजारा समाजाचा दावा करताच खा. गवळी यांनी बहिणीची कोणतीच अडचण नाही, कुठेही हस्तक्षेप नसल्याचे म्हणत भावनिक सादही घातली.

भावना गवळी निर्दोष आहात तर सोमय्यांवर अब्रू नुकसानीचा दावा का केला नाही? | सुषमा अंधारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed