मंत्री गिरीश महाजन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांनी अर्थ खात्यावर केलेल्या वक्तव्यावरुन गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अर्थ खातं कुणाकडे असावं? यावर भाष्य केलं आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखातं स्वत:कडे ठेवणं यातच शहाणपणा आहे. अर्थ खातं सांभाळण्यासाठी फडणवीस यांच्या इतकं सक्षम कुणी नाही”, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी राऊतांना टोला लगावला आहे. “संजय राऊतांनी महायुतीच्या अंतर्गत बाबींवर वक्तव्य करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावे. त्यांच्या स्वतःच्या पक्षात बऱ्याच अडचणी आणि गोंधळ सुरू आहे”, असा खोचक टोला गिरीश महाजन यांनी लगावला.
“दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे किंवा बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना या म्हणीप्रमाणे राऊत महायुतीच्या व्यवहारांवर नाहक भाष्य करत आहेत. महायुतीमध्ये कोणत्या नेत्याने कोणते खाते सांभाळावे, हे ठरवण्यासाठी त्यांचे सल्ले घेण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या पक्षापुरतेच बोलावे, आमच्यात नाक खुपसू नये”, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.
गिरीश महाजनांचा ठाकरेंवर घणाघात
“उद्धव ठाकरेंच्या काळात ते मुख्यमंत्री असताना कधीही विधानसभेत किंवा मंत्रालयात फिरकले नाहीत, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. कोरोनाच्या संकट काळातही ते घराबाहेर पडले नाहीत. आपल्याच आमदारांना वेळ न देणे, कोणाचेही ऐकून न घेणे आणि फक्त ‘मी आणि माझा परिवार’ याच विश्वात राहिल्यामुळे त्यांचे सर्व आमदार त्यांना सोडून गेले, यात काही नवीन सांगण्याची गरज नाही”, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.
गिरीश महाजन यांचा रोहित पवार यांच्यावर निशाणा
“आमदार रोहित पवार यांच्या पंढरपूर येथील आंदोलनाला कोणताही ठोस अर्थ नाही. त्यांना केवळ चॅनेल्सवर राहून ‘टीआरपी’ मिळवायचा असतो आणि सातत्याने काहीतरी नवीन नाटक उभे करायचे असते. ते अजून राजकारणात नवीन आहेत. पण सध्याच्या महायुती सरकारने कोणतीही निवडणूक नसताना केवळ शेतकऱ्यांची अडचण ओळखून कर्जमाफीचा मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तुमच्या आजोबांनी काय केले ते पहा आधी म्हणा”, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.
जळगाव आणि नाशिकच्या जागेवर काय म्हणाले?
“शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी काल शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी त्या ठिकाणीच जाहीर केलं की, आपण आपली उमेदवारी मागे घेत आहोत. महायुतीचे आता जळगावात एकच उमेदवार आहेत. नंदकिशोर महाजन हे एकच उमेदवार आहेत. नाशिक आणि जळगाव अशा दोन ठिकाणी बंडखोरी झाली होती. आता नाशिकला गोकुळ गीते यांनी माघार घेतली. त्यानंतर रेश्मा काळे यांनी जळगावमध्ये माघार घेतली. त्यामुळे दोन्ही ठिकाणी चित्र स्पष्ट झालेलं आहे. एकतर्फी निवडणूक आहे. त्यामुळे दोन्ही जागांवर मोठ्या मताधिक्याने महायुतीचे उमेदवार निवडून येतील. राज्याच्या सर्व 11 ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून येतील. विरोधकांचं खातंदेखील उघडणार नाही”, असा दावा महाजन यांनी केला.
“कुठलीही खेळी नाही. मी पोटात काही आणि ओठात काही असं कधीही वागत नाही. मी एकनाथ शिंदे यांना शब्द दिला होता की, बंडखोर उमेदवार माघार घेतील. ती जबाबदारी माझी राहील. तसं गोकुळ गीते यांनी सांगितलं होतं की, गिरीशभाऊ आमचे नेते आहेत. ते सांगतील ते करु. थोडा उशिर नक्कीच लागला. लवकर व्हायला पाहिजे होतं. पण ती माघार उशिरा झाली. पण आता चित्र स्पष्ट झालं आहे. गीते यांच्या मनात माघार घेतल्याने शल्य असेल. पण त्यांनी माघार घेतली आहे. नाशिकमध्ये महायुतीचाच उमेदवार निवडून येतील. आता कुठलाही नाराजीचा विषय राहिलेला नाही”, असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा