• Sat. Sep 21st, 2024
भरधाव कारचालकाचा प्रताप; ४ ते ५ जणांना चिरडलं, विद्यार्थिनीसह वृद्धाचा जागीच मृत्यू

जळगाव: जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. गोराडखेडा येथे भरधाव कारने चार ते पाच जणांना चिरडले असून अपघातानंतर भरधाव कारही पलटी झाली आहे. या भीषण अपघातात एका १६ वर्षीय विद्यार्थिनीसह ६० वर्षीय वृद्ध जागीच ठार झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ मदत कार्य करत जखमींना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवले असून घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी ही घटनास्थळी धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावहून काही तरुण एम एच १४ सी सी या क्रमांकाच्या कारने पाचोरा येथे आले होते. पाचोरा येथे तरुणांनी एका हॉटेलात मध्यप्राशन केले. तरुण पुन्हा जळगावकडे जाण्यासाठी निघाले. यादरम्यान दारूच्या नशेत असलेल्या तरुणाचे नियंत्रण सुटले. या भरधाव कारने गोराडखेडा येथे बस स्थानकावरील दोन विद्यार्थिनींसह दोन व्यक्तींना जोरदार धडक दिली. यात सायकलीवरून सोळा वर्षीय दुर्गा पाटील या विद्यार्थिनीसह सुभाष पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी एक विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाली असून गंभीर असल्याने एकाला जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आल आहे
रस्त्यात अचानक काही आडवं आलं अन् कारचं नियंत्रण सुटलं; एका क्षणात हसतंखेळतं कुटुंब उद्धवस्त
अपघातानंतर भरधाव कार ही उलटली. धडक एवढी जोरदार होती की अपघातात कालचा समोरील काल पूर्णपणे चक्काचूर झाल्याच पाहायला. अपघातानंतर घटनास्थळे ग्रामस्थांचे गजगर्दी जमले संतप्त ग्रामस्थांनी चौघांना कारमधून बाहेर काढत बेदम चोप देत कार जाळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाचोरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले तसेच ग्रामस्थांच्या तावडीतून कारमधील तरुणांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. पोलीस ठाण्यातही ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. तरुणांना आमच्या ताब्यात द्या, असं म्हणत ग्रामस्थ आक्रमक झाल्याचा पाहायला मिळाला. गर्दी लक्षात घेता पोलीस स्टेशनच्या गेटलाही बाहेरून कुलूप लावण्याची वेळ आली.

या अपघातात मयत झालेले विद्यार्थिनी दुर्गा पाटील हे गोराडखेडा गावात राहते. ती पाचोरा येथील हायस्कूल मध्ये दहावीला शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणे दुर्गा ही सायकलवरून हायस्कूलमध्ये गेली होती. सायंकाळी हायस्कूल सुटल्यानंतर सायकलवरून घराकडे परतत होते. नेमकं गावाच्या बस स्थानकावर पोहोचले असता , तिच्यावर भीषण अपघाताच्या रूपाने काळाने झडप घातली. भरधाव कारने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर मयत सुभाष पाटील हे सुद्धा गोराडखेडा गावातच राहतात. ते शेतकरी होते नेहमीप्रमाणे सायंकाळची वेळ असल्याने फेरफटका मारण्यासाठी गावाच्या बस स्टॉप वर आले होतें. या ठिकाणी एका रस्त्याच्या कडेला बसलेल्या असताना भरधाव फरफटत घेऊन गेली.

दादा मला वाचवा! भर कार्यक्रमात सुरेश वाडकरांची उपमुख्यमंत्री अजित पवारांना साद

तर दुसरी एक विद्यार्थिनी ही सुद्धा घराकडे परतत होती. तर तिच्याच पाठव तिचे वडील सुद्धा दुचाकीवरून गावात प्रवेश करत होते. याच दरम्यान दोघांनाही भरधाव कारने धडक दिली. यात विद्यार्थिनी किरकोळ जखमी असून त्याचे वडील गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी जळगावला हलविण्यात आले आहे. मद्याच्या नशेत कार चालवणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. दरम्यान आक्रमक झालेल्या ग्रामस्थांमुळे गोराडखेडा गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. अनुचित घटना घडू नये म्हणून या गावावरून जाणारी वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आल्याचे माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed