….तर महाविकास आघाडीचे सरकार टिकले नसते, सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा
अजित पवार यांना २०१९मध्ये उपमुख्यमंत्री केले नसते तर ते सरकार टिकले नसते, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी केला. पवार यांनी संघटनेत काम केले त्याचे प्रत्यंतर अनेकवेळा पहायला मिळाले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री केले ते चूक की बरोबर हे काळाच्या ओघात सिद्ध झाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.