• Sat. Sep 21st, 2024
गडचिरोलीत आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा, १०० मुलींना रुग्णालयात हलवले

गडचिरोली: शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना धानोरा तालुक्यातील सोडे येथे घडली आहे. जवळपास १०० विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याने त्यांना उपचारासाठी धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जिल्हा मुख्यालयात उपचारार्थ हलविल्याची माहिती समोर येत आहे.

धानोरा तालुक्यातील सोडे या गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या माध्यमातून शासकीय मुलींची आश्रमशाळा चालवली जाते.याठिकाणी केवळ मुलींसाठी आश्रमशाळा असून धानोरा तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील जवळपास ३८० आदिवासी मुली निवासी स्वरूपात शिक्षण घेतात.

बुधवार (२० डिसेंबर) रोजी नेहमीप्रमाणे सर्व विद्यार्थिनींना दुपारच्या सुमारास जेवण देण्यात आले. आलू,गोबी,वरण भात याचं भोजन केल्यानंतर काही वेळाने विद्यार्थिनींच्या पोटात दुखने, काहींना चक्कर येणे तर मळमळ वाटणे सुरू झाले. याची तक्रार विद्यार्थिनींनी शाळेच्या शिक्षकांकडे केली.

लगेच येथील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी रुग्णवाहिका बोलावून तब्बल १०० पेक्षा अधिक विद्यार्थिनींना धानोरा तालुका मुख्यालयात असलेल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.याची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी धानोरा येथे धाव घेतली.त्यातील काही विद्यार्थिनिंची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा मुख्यालयात उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
अमरावती हत्या प्रकरण; संशयाचं भूत डोक्यात शिरलं, रागात दारु विक्रत्यानं कुटुंबाला चिरडलं, वाचा सविस्तर…
सोडे येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनींची प्रकृर्ती अचानक बिघडल्याने तब्बल ९१ विद्यार्थिनींना धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविले असून सध्या प्रकृर्ती स्थिर असल्याची माहिती येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोमणकर यांनी दिली आहे. काही विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक असल्याची देखील माहिती मिळतेय.
करोनाच्या JN1चा अलर्ट! ठाण्यातील नव्या व्हेरिंएटचा पहिल्या रुग्णाची प्रकृती चिंताजनक
दरम्यान, ही घटना उघडकीस येताच आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत देण्यात येणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तब्बल १०० हून अधिक विद्यार्थिनींना विषबाधा होणं ही घटना मोठी आहे. या घटनेबद्दल माहिती समोर येताच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन पुढे काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, पुणे विभागातील विशेष रेल्वे गाड्यांच्या ४५५ फेऱ्या वाढवल्या, जाणून घ्या अपडेट

उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर आदिवासी विद्यार्थ्यांचं रेला नृत्य

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed