• Sat. Sep 21st, 2024
विरोधी पक्षाचे ९२ खासदार निलंबित, देशात लोकशाही असल्याचा आपण आव का आणतोय?आदित्य ठाकरे संतापले

मुंबई : नव्या संसद भवनातील सुरक्षाभंगाच्या घटनेवरून चर्चेची मागणी करणाऱ्या आणि ती मागणी सरकार मान्य करत नसल्याने गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या २ खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेत ४६ आणि राज्यसभेत ४६ असे एकूण ९२ खासदार निलंबित करण्यात आले आहेत. या घटनेवर शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिलीये. अजूनही आपण लोकशाहीत असल्याचा आव का आणतो आहोत? असा सवाल विचारताना भारताची जनता हुकूमशाही संपवेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

संसद भवनातील सुरक्षाभंगावरून लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षांच्या ३१ खासदारांचं निलंबन केलं. त्यापाठोपाठ राज्यसभेत सभापती जगदीप धनकड यांनी राज्यसभेच्या ४६ खासदारांना निलंबित केलं. ३४ खासदारांना हिवाळी अधिवेनाच्या उर्वरित कालावधीसाठी तर विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत ११ खासदारांना निलंबित केलं आहे. समितीला तीन महिन्यांत अहवाल देण्याचे निर्देश सभापतींनी दिले आहेत. संसद भवनातील सुरक्षाभंगावर सरकारने अधिकृतपणे भूमिका मांडून यावर सभागृहात चर्चा करावी, अशी मागणी निलंबित झालेले खासदार गेली दोन-तीन दिवस करत होते. त्यावरून संसद कामकाजात व्यत्यय येत होता. अखेर लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांनी जवळपास ९२ खासदारांवर कारवाई केली.

विरोधकांवर निलंबनास्त्र,राज्यसभा आणि लोकसभेतून एकाच दिवशी ७८ खासदारांचं निलंबन,आतापर्यंत किती खासदार निलंबित?

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

ह्या हिवाळी अधिवेशनात आजपर्यंत विरोधी पक्षांच्या ९२ खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले आहे. उरलेल्यांचे निलंबन किती दिवसात करण्याचा इरादा आहे? असा सवाल उपस्थित करत अजूनही आपण लोकशाहीत असल्याचा आव का आणतो आहोत? अशी उद्विग्नता आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

सभागृहाच्या कामकाजात अडथळा; काँग्रेसच्या ९ खासदारांसह १५ खासदारांवर निलंबनाची कारवाई
१३ डिसेंबर २०२३ रोजी संसदेत झालेल्या सुरक्षेच्या उल्लंघनावर विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरकारकडून उत्तर मागितले होते, हा त्यांचा दोष होता. आपल्या देशातली लोकशाही अक्षरशः संपली आहे, जी खरंतर अनेक संस्थांनी टिकवून ठेवली पाहिजे होती. आता भारतात पुन्हा लोकशाही प्रस्थापित करणं हे भारतातल्या नागरिकांवर अवलंबून आहे, असं सांगताना निवडणूक आयोग निष्पक्ष आणि मुक्त पद्धतीने निवडणूका घेईल आणि भारतीय नागरिक त्या प्रक्रियेत सहभागी होऊन ही हुकूमशाही संपवेल अशी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलीये.

हातवारे करु नका, नाहीतर तुम्ही इथे नाचायला लागाल! जगदीप धनखड यांच्याकडून राघव चढ्ढा यांची खरडपट्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed