• Sat. Sep 21st, 2024
लग्नावरून परतताना अनर्थ, अपघातात अख्खं कुटुंब गेलं; चिमुकल्यांचं आयुष्य सुरू होण्याआधीच संपलं

पुणे : नगर – कल्याण महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील अंजिराची बाग येथे तिहेरी भीषण अपघात होऊन आठ जण जागीच मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली. त्यात एका कुटुंबातील चौघांना आपला जीव गमावावा लागला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा देखील समावेश होता. या चिमुकल्यांचे आयुष्य सुरू होण्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

नगर – कल्याण महामार्गावरील डिंगोरे हद्दीत येथे काल रविवारी रात्री अकराच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात माळशेज घाटाशेजारी असणारे मढ या गावात राहणाऱ्या संपूर्ण कुटुंबाचा अपघातात मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथून मेव्हणीच्या लग्नावरून रात्री उशिरा घरी परतत असताना या कुटुंबावर काळाने घाला घातला. गणेश मस्करे (वय ३०), कोमल मस्करे (वय २५), हर्षद मस्करे (वय ४), काव्या मास्करे (वय ६) अशी मृतांची नावे आहेत.
धारावी पुनर्विकास प्रकल्पात कोणत्याही एका व्यक्तीचा नव्हे तर सामान्य माणसाचा फायदा होईल: एकनाथ शिंदे
गणेश मस्करे हे आपल्या कुटुंबासोबत आपल्या मेव्हणीच्या लग्नासाठी जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी या गावी गेले होते. लग्न आटोपून ते रात्री उशिरा आपल्या घरी परतत होते. ते भाजीपाला व्यावसायिक असल्याने त्यांनी पीकअप गाडी भरली होती. आपल्या कुटुंबाला घरी सोडून ते नेहमीप्रमाणे टोकावडे याठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी जाणार होते. मात्र, नियतीच्या मनात काही तरी औरच होते. ते आपल्या घरी पोहचण्याअगोदरच पिंपळगाव जोगा या ठिकाणी त्यांच्या गाडीचा भीषण आपघात झाला. या अपघातात बायको आणि त्यांच्या दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मस्करे कुटुंब हे गावातील अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे कुटुंब होते. ते गावातील स्थानिक रहिवासी असल्याने सर्वांशी त्यांचा चांगला सलोखा होता. मात्र. त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.

कसा झाला अपघात?

आळेफाटाकडून भाजीपाला घेऊन पीकअप नंबर एमएच १४ एचजी १९४० ही ओतूरकडून कल्याणकडे जात असताना कल्याणकडून ओतूरकडे येणारी प्रवासी रिक्षा नंबर एमएच ०३ बीवाय ९०२३ हिला पेट्रोलपंपासमोर पीकअपची धडक लागली. या अपघातात रिक्षामधील चालक आणि २ प्रवासी यांचा मृत्यू झाला. तसेच पीकअप चालक, स्वतःव कॅबिनमध्ये बसलेली त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी आणि मागे बसलेला हमाल असे सर्वजण पीकअपमध्ये बसले होते. धडक दिल्याने पीकअप डाव्या बाजूस पडून घसरत जाऊन कल्याणकडून येणाऱ्या ट्रकची नंबर एमएच १६ डीसी ११६० याची धडक बसली. त्यामुळे पीकअप मधील ५ जण असे एकूण ८ जणांचा जागीच मृत्यू झाला.
Otur Accident: मोठी बातमी,नगर कल्याण महामार्गावर तिहेरी अपघात, ८ जणांचा मृत्यू, एका कुटुंबातील चौघांचा समावेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed