• Sat. Sep 21st, 2024

शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे सर्वात मोठे विरोधक, फडणवीसांची शरद पवारांवर घणाघाती टीका

शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे सर्वात मोठे विरोधक, फडणवीसांची शरद पवारांवर घणाघाती टीका

मुंबई: आज राज्यभरात मराठा आरक्षणासाठी मोठी आंदोलनं सुरु आहेत. परंतु, मराठा आरक्षणाचा इतिहास काढून बघितला तर कळेल की, मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध हा शरद पवार यांनीच केला. त्यांना वारंवार संधी मिळाली. त्यांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला असता तेव्हाच शरद पवार यांनी मराठा आरक्षण दिले असते. पण शरद पवार यांना मराठा समाजाला कधीच आरक्षण दिले नाही, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते शनिवारी नागपूर येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. शरद पवार यांना केवळ विविध समाजांना झुंजवत ठेवण्यात जास्त रस आहे. लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपद राहील, ही शरद पवारांच्या राजकारणाची पद्धत राहिली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी लोकांना सतत झुंजवत ठेवण्याचे काम केले, असे फडणवीस यांनी म्हटले.

महाविकास आघाडीची सत्ता असताना सुप्रिया सुळे म्हणायच्या की, राज्यात मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? भाजपचे सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले. आपलं सरकार असताना ते सर्वोच्च न्यायालयात टिकलंही, पण सरकार गेल्यानंतर मराठा आरक्षणावर स्थगिती आली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करेल. पण कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊन देणार नाही. ओबीसी आरक्षणावर कुठलंही संकट येऊ देणार नाही, हे भाजपचं वचन आहे. भाजपमधील ओबीसी आणि मराठा कार्यकर्त्यांना आपल्या समाजाची बाजू योग्य वाटणे साहजिक आहे. पण दोन्ही समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपला पक्ष आपल्या समाजाला न्याय देईल, यावर विश्वास ठेवावा. कोणत्याही परिस्थितीत समाजात विभाजनाचे लोण पसरुन देऊ नका, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाचा सर्व्हे गोखले इन्स्टिट्यूटमार्फत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही: बालाजी किल्लारीकर

मराठा-ओबीसी वादामुळे महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवली जातेय, हे चिंतानजक: फडणवीस

मराठा आणि ओबीसी हे समाज आपल्यासाठी केवळ व्होटबँक नाहीत. आपण निवडणुकीच्या निकालाचा विचार करुन कोणत्याही समाजाबाबत निर्णय घेत नाही. मुळात या मुद्द्याचा निवडणुकीवर फरक पडत नाही. हे समाजाचे प्रश्न आहेत. त्याकडे निवडणुकीच्या चष्म्यातून पाहू नका. त्यामुळे निवडणुकीत काय होणार, याची चिंता भाजपच्या कार्यकर्त्यांनी करु नये. चिंता करायची असेल तर महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक कुठेतरी उसवलं जातंय, फाटतंय, त्याबद्दल विचार केला पाहिजे. ही परिस्थिती चिंताजनक आहे. गावगाड्यावर सर्व लोक एकत्र राहिले आहेत. सगळे लोक एकमेकांवर अवलंबून असतात. प्रत्येक समाजाचे महत्त्वं वेगळे असते. पंतप्रधान मोदी म्हणतात, जात, धर्म महत्त्वाचा नाही. माझ्यासाठी गरिबी ही एकच जात आहे. आरक्षणाची भावना गरिबीतून निर्माण होते. त्या भावनेपोटी आपण मागास आहोत, असे संबंधितांना वाटते. त्यामुळे आपण आरक्षण देऊच. परंतु, मागासलेपणच दूर नाही झाले तर कितीही आरक्षण देऊन फायदा होणार नाही, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.

मराठा समाजाने कुणबीतून आरक्षण घेतलं तर… आशिष शेलारांनी करुन दिली मोठ्या धोक्याची जाणीव

प्रसारमाध्यमांमध्ये विरोधकांना कितीही नरेटिव्ह सेट करु द्या, भाजपला फरक पडत नाही: फडणवीस

मराठा आरक्षणावरुन विरोधकांकडून सुरु असलेल्या प्रचाराविषयी फारशी चिंता करु नका, असा संदेश देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला. कोणी काही नरेटिव्ह तयार करु द्या. हे लोक फक्त प्रसारमाध्यमांत दिसणार आहेत. प्रसारमाध्यमांच्या बातम्यांचा परिणाम होत असता तर भाजप कधीच निवडून आला नसता. प्रसारमाध्यमांची भूमिका ही महत्त्वाची आहे. पण ज्यावेळेला एखादं नरेटिव्ह सत्यापासून विपरीत असतं, त्यामध्ये केवळ राजकारण असलं तरी ते तुमचं भाग्य बदलू शकत नाही. कारण हे नरेटिव्ह फक्त चार-पाच दिवस चालतं, त्यानंतर त्याची चर्चा बंद होते, असे देवेंद्र फडणवीसांना म्हटले.

मराठा आरक्षणासंदर्भात भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. काही नेत्यांनी वॉररुम उघडल्या, त्यासाठी क्रिएटिव्ह तयार करुन सोशल मीडियावर टाकले. पण त्याचा काही फायदा झाला नाही. कारण शेवटी एक बोट त्यांच्याकडेच गेले, तुमचे बापजादे इतकी वर्षे होते, त्यांनी मराठा आरक्षण का दिले नाही? हा प्रश्न लोकांनीच उपस्थित केला. याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. महाराष्ट्रातील सामान्य जनतेचा भाजपवर विश्वास आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

भुजबळांना गोळी मारली जाईल, इनपूट आलंय; भुजबळांच्या विधानसभेतील गौप्यस्फोटानंतर मनोज जरांगेंनी सुनावलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed