• Fri. Mar 20th, 2026
    शेतकरी पुत्र आहोत म्हणून लग्नासाठी कोणी मुलगी देईना,युवा शेतकऱ्यांचा विधिमंडळावर मोर्चा

    नागपूर : नागपुरात राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यानिमित्त विधान भवनावर विविध आंदोलने आणि मोर्चे येत असतात आणि काही मोर्चे नेहमीच लक्ष वेधूनही घेतात. मात्र, आज नागपूरात आलेल्या तरुणांच्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बेरोजगारांना नोकरी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवा आणि सेवेत असणाऱ्यांना पगारवाढ , शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव हवा आहे. अशा विविध मागण्या घेऊन दररोज अनेक मोर्चे विधानभवनावर पोहोचत . मात्र, शुक्रवारी आलेल्या शेतकरीपुत्राच्या मोर्चाची मागणी वेगळी होती.

    हा मोर्चा शेतकरीपुत्रांचा होता.आम्ही शेतकरी कुटुंबात जन्माला आलो आणि शेती हा व्यवसाय म्हणून आम्ही स्वीकार केला. मात्र, शेती हा व्यवसाय निवडल्या मुळे आमचे लग्न होत होत नाही आहे. आम्ही यशस्वीपणे शेती करतो, चांगलं उत्पन्न ही मिळवतो. पण तरी देखील आम्हाला कोणीही मुली देत नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या शेतममालाला चांगला भाव द्यावा, चांगल्या भावाची हमी द्यावी, जेणेकरुन शेतकऱ्यांना लग्नासाठी मुली देण्याचे धाडस त्यांच्या पालकांनी दाखवावे,असं मत या आंदोलनातील तरुण शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.
    काँग्रेसचं मिशन लोकसभा महाराष्ट्रातून सुरु होणार, महारॅलीची तारीख अन् ठिकाण ठरलं, दिग्गज नेते मैदानात
    शेतमालाला रास्त भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. त्यामुळे शेतमालाला अधिक भाव मिळावा या मागणीसाठी विदर्भातील विवाहित शेतकऱ्यांच्या मुलांनी शुक्रवारी विधानभवनावर धडक दिली. त्यांच्या हातातील फलक आकर्षक होते. “माझ्या शेतमालाला भाव मिळत नाही, म्हणून मला लग्ना साठी मुली मिळत नाही”, “मला शेतीसाठी वीज मिळत नाही. अवकाळी पावसा मुळे झालेल्या नुकसाभरपाई मिळत नाही.
    ‘एसआरए’ इमारतींचे दोनदा ऑडिट होणार,आगीच्या घटना रोखण्यासाठी निर्णय,गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची घोषणा
    “माझ्या शेतमालाला भाव मिळत नाही. पैशाशिवाय जगता येत नाही, लग्नाशिवाय मरताही येत नाही, काय करू? मी एक लग्नाळू शेतकरी” असे लिहिलेले फलक होते. शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाला रास्त भाव मिळाल्यास त्याची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तरुण शेतकऱ्याला लग्नासाठी मुली देण्यास पालक तयार होइल. असा संदेश देण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून या तरुणांकडून करण्यात आला. शेतकरी पुत्रांच्या मागण्यांची सरकार आणि समाज गांभीर्यानं दखल घेईल का हाच खरा प्रश्न आहे.

    रायगडचं पालकमंत्रिपद आमची वाट पाहतंय, मंत्रिमंडळ विस्तारावर भरत गोगावले थेटच बोलले, म्हणाले अधिवेशनानंतर…
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *