• Wed. Mar 18th, 2026

    मोदी लाटेमध्ये एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, उद्धव ठाकरेंचं ओपन चॅलेंज

    मोदी लाटेमध्ये एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, उद्धव ठाकरेंचं ओपन चॅलेंज

    मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर देशात मोदींची मोठी लाट असल्याची चर्चा आहे. पण मला त्यांना सांगायचंय की तुमची देशात एवढीच जर लाट आहे तर त्या लाटेमध्ये एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, असं खुलं आव्हान देत भाजपला मिळालेल्या विजयावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शंका उपस्थित केली. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी लांबलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीवरून सरकारला लक्ष्य केलं.

    मुंबईतील नरीमन पॉईंट येथील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ‘शिवालय’ या कार्यालयाचं नुतनीकरण करण्यात आलं आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्प, चार राज्यांचा निवडणूक निकाल तसेच निवडणुकीत बॅलेट पेपरचा आग्रह अशा मुद्द्यांवर भाष्य केलं.

    तुमची लाट आहे म्हणता तर लोकसभेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, ठाकरेंचं भाजपला थेट चॅलेंज

    मोदी लाटेमध्ये एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा

    उद्धव ठाकरे म्हणाले, तुमची देशात एवढीच जर लाट आहे तर त्या लाटेमध्ये एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. म्हणजे आमच्या मनात शंका नको. सगळे वातावरण विरोधात असताना, एक्झिट पोलच्याही पलीकडे जाऊन उलटा-पालटा निकाल कसा लागला? हे कसे घडले? असा प्रश्न मतदारांना पडणार असेल तर त्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी दम असेल तर एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिलं.

    पत्र लिहिलं, उत्तर दिलं नाही, आम्ही काय समजायचं? निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर उद्धव ठाकरेंची तीव्र नाराजी
    चार राज्यांच्या निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळालं आहं. माझं त्यांना आव्हान आहे की, पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक घ्या. महापालिकेची निवडणूक वर्ष ते दीड वर्षे पुढे ढकलली आहे. सिनेटची निवडणूक लांबवली जात आहे, दम असेल तर निवडणुका घेऊन दाखवा, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

    अदानी कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा

    धारावीत आता जे लोक राहत आहेत, त्यांचं धारावीतच पुनर्वसन व्हावं, अशी शिवसेनेची मागणी आहे. धारावीला स्पेशल प्रोजेक्ट म्हणून जाहीर केलं आहे आणि ३०० स्क्वेअर फूट जागा देणार असल्याचं सांगतायेत. मात्र पुनर्विकास करत असताना धारावीकरांना ४०० ते ५०० स्क्वेअर फूट एवढी जागा मिळायला हवी. येत्या १६ तारखेला आमचा अदानी कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा असेल, अशी घोषणाच त्यांनी यावेळी केली.

    निवडणूक काळात विरोधकांवर धाडी टाकल्या, प्रचाराला खीळ बसवली, मोदी-शाहांसोबत तपास यंत्रणांचं देखील अभिनंदन : संजय राऊत

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *