• Sat. Sep 21st, 2024
वाढदिवशी बायको अन् लेकाला संपवलं, कल्याणमधील खून प्रकरणाचं कारण समोर

ठाणे (कल्याण) : कल्याण हत्याकांडातील आरोपी व्यावसायिक दीपक गायकवाड याच्यावर जवळपास ८० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार होता. त्यामुळे तो त्याच्या पत्नीकडे पैशांची मागणी करायचा. पैशांच्या कारणावरुन तो पत्नीला घटस्फोट देणार होता. यावरुन त्यांचे वाद सुरु होते. त्यामुळे त्यांच्यात भांडणे होत होती. शुक्रवारीही त्यांची अशीच भांडण झाली. त्यावेळी पत्नी अश्विनी हीने त्याची कॉलर पकडली. त्याचा राग पती दीपकला आला. त्याने रागाच्याभरात तिची गळा दाबून हत्या केली. पत्नीची हत्या केल्यावर मुलाला कोण संभाळणार यामुळे त्याने मुलगा आदिराज याचीही हत्या केली. दरम्यान, फरार व्यावसायिक दीपक गायकवाड याला महात्मा फुले पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केली आहे.

मयत मुलाचा आणि पत्नीचा मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. मात्र, मयत अश्विनी गायकवाडचे कुटुंबियांनी ”दीपक गायकवाडला आमच्या समोर आणा”, अशी ठाम भूमिका घेतली. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. पोलीस ठाण्यात जमा होऊन त्यांनी आरोपी दीपक याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. तर अश्विनी गायकवाडचा भाऊ विकी मोरे यांनी खुलासा केला आहे की, कशाप्रकारे पैशांसाठी अश्विनीला आणि तिच्या मुलाला जिवे ठार मारण्याची धमकी दिली जात होती.

अमोल कोल्हेंच्या आरोपांना मुंबई वाहतूक पोलिसांचं प्रत्युत्तर, आपल्या वाहनाचाही दंड थकला म्हणत रक्कम सांगितली
कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात लेन नबंर तीनमध्ये राहणाऱ्या नानूज वर्ल्ड या दुकानाचा मालक दीपक गायकवाड मुलाची आणि पत्नीची हत्या करुन पसार झाला. महात्मा फुले पोलिसांनी संभाजीनगरमधून दीपक गायकवाडला ताब्यात घेतलं. मयत अश्विनी गायकवाड हिचे कुटुंब कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात जमले होते. या ठिकाणी सात वर्षाचा आदिराज आणि त्याची आई अश्विनी हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलं आहे. कुटुंबियांची एकच मागणी आहे. क्रूर निर्दयी दीपक गायकवाडला आमच्यासमोर आणा. तोपर्यंत अश्विनीचा आणि आदीराजचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.

कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक महात्मा फुले पोलीस ठाण्यात जमा झाले. त्याठिकाणी त्यांनी दीपक गायकवाडला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली. या वेळी अश्विनीचा भाऊ विकी मोरे यांनी खुलासा केला आहे की, कशा प्रकारे अश्विनीला पैशांसाठी त्रास दिला होता. अश्विनीकडून पैशांची मागणी केली जात होती. आम्ही दीपक गायकवाडला वेळोवेळी पैसे दिले आहे. काही दिवसांपूर्वी पाच लाख रुपये तिला दिले होते. तो हीच धमकी द्यायचा की पैसे दिले नाहीत तर तुझ्यासह तुझ्या मुलाला मारुन टाकणार. अखेर त्याने तेच केलं, असं भाऊ विकी मोरे यांनी यांवेळी सांगितलं.

आता आमचा योग्य पद्धतीने सुखाचा संसार सुरु झालाय, शंभूराज देसाईंची साताऱ्याच्या जागेबद्दल सावध भूमिका,म्हणाले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed