निर्जनस्थळी हत्या झाल्यामुळे कुठलाही साक्षीदार नसताना तपास करणे पोलिसांसमोर आवाहन होते. परंतु गोपणीय आणि तांत्रिक दृष्ट्या तपास करत पोलिसांनी याप्रकरणी संशयित संदीप छगन गायकवाड (वय ३०) आणि त्याचा अल्पवयीन एक १६ वर्षीय साथीदार यास ताब्यात घेतले आहे. यावेळी हत्येच्या हेतूने तपास करत असताना संदीप यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खून केल्याची कबुली दिली.
मयताचे वडील दगु जयराम उशीर (वय ५७ रा. खडकजांब ता. चांदवड) यांनी यांच्या मुलाला मारण्याची सुपारी दिल्याचे सांगितले. मयत मुलगा किशोर उर्फ (टिल्लु) हा दारु पिऊन सतत पैशांची मागणी करुन शिवीगाळ आणि दमदाटी करायचा म्हणून त्या त्रासाला कंटाळुन त्याला जीवे मारण्यासाठी १८ हजार रुपयांची सुपारी संशयित आरोपी संदीप आणि त्याचा सहकारी असलेल्या अल्पवयीन मुलास दिली होती.
दारु पिऊन शिवीगाळ करुन पैशांची सतत मागणी करणाऱ्या मुलाची वडिलांनीच १८ हजार रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वणी पोलिसांनी मयताच्या वडिलांसह तीन संशयितांना ताब्यात घेतले असून संशयितांमध्ये एका अल्पवयीन बालकाचा देखील समावेश आहे. दरम्यान, संदीप याला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी असून विधीसंघर्षित बालकाला बालसुधार गृहात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही संशयितांनी किशोर उर्फ टिल्लुची हत्या केल्याचे कबुल केले असून या संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मयताचे वडील दगु जयराम उशीर यांना ताब्यात घेतले आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News