– जिल्ह्यात २००१ ते ऑक्टोंबर २०२३ या काळात तब्बल २९४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कुणी गळफास घेतला, कुणी विषारी औषध प्राशन केले, कुणी विहिरीत, तलावात उडी घेत जीवनप्रवास थांबविला.
– नापिकी, निसर्गाचा लहरीपणा, पेरलेले पीक अपेक्षित प्रमाणात घरी न येण्याची शाश्वती, आर्थिक चणचण, बँकेच्या कर्जाचा वाढता डोंगर याची चिंता शेतकऱ्याला सतावत असते.
– कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, मुलांचे शिक्षण या आणि अशाच समस्यांच्या चक्रव्युहात साडपलेला शेतकरी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलतो.
– शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नेमलेल्या समितीसमोर शासनाने लावलेल्या जाचक अटीमुळे जिल्ह्यातील अपात्र १२७ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अद्यापही न्याय मिळू शकला नाही.
– जिल्ह्यात २०१५ व १६ या वर्षी सर्वाधिक आत्महत्या झाल्या. दोन वर्षांतील ६२ आत्महत्यांपैकी केवळ २० पात्र ठरल्या असून ४२ अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत.
– आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासनाकडून १ लाख रुपयांची मदत मिळते. जिल्ह्यात आतापर्यंत १ कोटी ६७ लाख रुपये शासनातर्फे पात्र असलेल्यांना देण्यात आलेले आहेत.