• Fri. Mar 6th, 2026
    येरवडा कारागृहातून कुख्यात गुंड पळाला, हत्या प्रकरणातील कैदी आशिष जाधव फरार

    पुणे : येरवडा कारागृहातून कैदी फरार होण्याचे प्रकार नवीन नाहीत. यापूर्वी अनेक कैदी पुण्याच्या कुप्रसिद्ध येरवडा जेलमधून पसार झाले आहेत. तरीही कारागृह प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतो. खुनाच्या आरोपाखाली येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड आशिष जाधव काल पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

    पोलिसांना चकवा देऊन आणखी एक कैदी तुरुंगातून पळून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

    पन्नाशीत प्रियकर, २२ वर्षांची प्रेयसी; चॅटिंगमुळे पत्नीसमोर भांडाफोड, तुटणारा संसार असा सावरला
    २००८ साली वारजे पोलीस स्टेशन येथे खुनाच्या गुन्ह्यात आरोपी आशिष जाधवला अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाने ३०२ च्या आरोपाखाली त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. जाधवला येरवडा कारागरातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. या कामादरम्यानच तो पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे.

    प्रेग्नन्सीचं ढोंग, रेल्वेने प्रवास करणाऱ्या पाच महिलांना बेड्या, कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल
    संवेदनशील अन् कडक सुरक्षा व्यवस्थेत काल दुपारच्या सुमारास कारागृहातील कैद्यांची तुरुंग अधिकाऱ्यांनी मोजणी केली. त्यावेळेस अशिष जाधव हा कारागृहातील अधिकाऱ्यांना आढळून आला नाही. त्यामुळे जाधव हा फरार झाल्याचं लक्षात आलं. राज्यातील सर्वात संवेदनशील आणि कडक सुरक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या येरवडा करागृहातूनच तो पळाल्याने खळबळ उडाली आहे.

    कारागृहातल्या कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची दिवाळीनिमित्त विक्री सुरु’; कोल्हापूरकरांना आकर्षण

    Read Latest Pune Updates And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed