• Sat. Sep 12th, 2026

मराठवाड्याच्या २१ टीएमसी पाण्याला भ्रष्टाचाराची गळती? अधिकारी, ठेकेदाराने योजनेला हरताळ फासली

मराठवाड्याच्या २१ टीएमसी पाण्याला भ्रष्टाचाराची गळती? अधिकारी, ठेकेदाराने योजनेला हरताळ फासली

धाराशिव: मराठवाड्याच्या हक्काच्या २१ टीएमसी पाण्याला गळती लागण्याचा प्रकार तुळजापुर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे घडला आहे. अधिकारी, ठेकेदाराने योजनेला हरताळ फासण्याचे काम केले आहे. पांगरदरवाडी ग्रामस्थांनी काम बंद करुन ठेकेदार, अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
Chhagan Bhujbal : अंतरवाली सराटीत पोलिसांच्या लाठीचार्ज अगोदर काय घडलेलं?छगन भुजबळ घटनाक्रम सांगत म्हणाले…
पहिल्या टप्यात कृष्णा खोरेचे ७ टीएमसी पाणी पांगरदरवाडी मार्गे धाराशिव – लातुर – बीड जिल्ह्याला मिळणार आहे. पांगरदरवाडी पंप हाऊस ते कालवा या दरम्यान ५४० मीटर भुमिगत पाईपलाईन टाकली जाणार आहे. यासाठी ७ कोटी १६ लाख रुपये निधीची तरतूद केली असून छत्रपती संभाजीनगर येथील निर्माण गोल्ड कंट्रक्शन कंपनीला हे काम दिले आहे.

गावबंदीचे फलक ताबडतोब हटवा, महाराष्ट्राचा सातबारा काय तुमच्या नावावर केला काय? भुजबळ बरसले

अंथरलेल्या पाईपला मातीमध्ये गाढणे अपेक्षित असताना संबधित गुत्तेदाराने पाईपवर मोठ मोठे दगड टाकून पाईप पुरल्याने पाईपला नुकसान केले आहे. भविष्यात पाईप फुटून पाणी गळती होणार असून हक्काचे पाणी धाराशिव जिल्ह्याला मिळायला उशीर लागणार आहे. विशेष म्हणजे २०० मिटर कामाकडे संबधित अधिकाऱ्यांनी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करुन गुत्तेदाराला अभय देण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed