• Sat. Sep 21st, 2024

मोसंबी फळबागांना दुष्काळाची झळ, पाणी नसल्यामुळे बागा धोक्यात, शेतकऱ्यांची चिंता वाढली

मोसंबी फळबागांना दुष्काळाची झळ, पाणी नसल्यामुळे बागा धोक्यात, शेतकऱ्यांची चिंता वाढली

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: कमी पर्जन्यमान आणि पाणीसाठा नसल्यामुळे मराठवाड्यातील मोसंबीच्या फळबागा धोक्यात आल्या आहेत. सध्या फळबागांसाठी पाणीटंचाई जाणवत आहे. डिसेंबरनंतर टंचाई वाढणार असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जायकवाडी धरणातून जास्तीचे आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

यंदा मराठवाड्यात कमी पावसामुळे मध्यम आणि लघु प्रकल्पात पाणीसाठा नाही. भूजल पातळीही खालावली आहे. शेततळे आणि बंधारे कोरडे असल्यामुळे शेतीला पाणी उपलब्ध नाही. सध्या उन्हाची तीव्रता कमी असल्यामुळे पाणी टंचाई जाणवत नाही. मात्र, डिसेंबर महिन्यापासून फळबागांना पाण्याची गरज भासणार आहे. विभागात मोसंबीचे सर्वाधिक जवळपास ५४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी सरासरी आठ ते दहा टन उत्पादन होते. दहा ते १५ हजार रुपये प्रतिटन भाव असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात मोसंबीचे क्षेत्र वाढले आहे. दोन जिल्ह्यात ४५ हजार हेक्टरपेक्षा जास्त मोसंबीचे क्षेत्र आहे.

आढळराव पाटील अजित पवारांसोबत जाणार? शिरूरच्या राजकारणात जोरदार चर्चा, आढळराव म्हणाले….

मोसंबीच्या निर्यात सुविधा केंद्रासाठी विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यभरात एक लाख हेक्टरवर मोसंबीचे क्षेत्र असून त्यापैकी निम्मे क्षेत्र मराठवाड्यातील दोन जिल्ह्यात आहे. या क्षेत्राला पाणी टंचाईची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. पाण्याअभावी फळगळ सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी फळ काढणी केली होती. या हंगामात बहार न घेण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांनी फळबाग वाचविण्यावर भर दिला आहे. गेवराई, अंबड, पैठण, घनसावंगी, बदनापूर या तालुक्यात मोसंबीचे जास्त क्षेत्र आहे. या बागा वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. २०१२ मधील दुष्काळात मोसंबीच्या बागा जळाल्या होत्या. त्यानंतर शेतकरी डाळिंब लागवडीकडे वळले होते. मात्र, डाळिंब फळबागांच्या संगोपनाचा खर्च जास्त असल्याने मागील तीन वर्षांत पुन्हा मोसंबी लागवडीकडे वळले आहेत.

झाडे वाळण्याची भीती

सध्या रब्बी हंगामासाठी जायकवाडी धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे. कालव्याचे पाणी चार जिल्ह्यातून जात असल्यामुळे रब्बी पिकांसह फळबागांनाही फायदा झाला आहे. मात्र, पुढील काळात टंचाई वाढण्याची शक्यात आहे. उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे फळगळ वाढण्याची भीती आहे. पाण्याचा मोठा ताण पडल्यास फळगळ होऊन झाडे वाळण्याची भीती आहे. झाडे वाळल्यास पुन्हा नव्याने लागवडीचा खर्च शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे.

सरकार नगर-नाशिकच्या राजकीय पुढार्‍यांच्या दबावाला बळी पडतंय का? जायकवाडीत पाणी सोडावं यासाठी निदर्शने
शेतकऱ्यांनी पुढचा आंबेबहार घेण्याऐवजी फळबाग जगविण्याला प्राधान्य द्यावे. ज्यांनी मृगबहार घेतला असेल आणि पाणी कमी असेल तर फळांची विरळणी करावी. त्यामुळे कमी पाण्यात पीक निघेल. पाणी टंचाईच्या काळात ठिबक सिंचन, मटका सिंचन आणि झाडांना आच्छादन करावे. झाडाला बोर्डोपेस्ट आणि हायड्रो जेल लावावे. एका सरीआड पाणी दिल्यामुळे फळबाग जगवणे शक्य होईल.

डॉ. संजय पाटील, वरिष्ठ शास्त्रज्ञ, मोसंबी फळबाग संशोधन केंद्र

४० तालुक्यांमध्ये दुष्काळ मग इतर तालुक्यांमध्ये शेत हिरवंगार झालं का? | रविकांत तुपकर

Read Latest Maharasahtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed