• Thu. Mar 19th, 2026

    व्यापार, धोरण अन् सुसंवादाचा अभाव, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा, नेमकं कोण टार्गेटवर

    व्यापार, धोरण अन् सुसंवादाचा अभाव, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा, नेमकं कोण टार्गेटवर

    पुणे: बारामतीतील व्यापारी असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्यापारी मार्गदर्शन मेळाव्यात शरद पवार यांनी पंतप्रधानांसह अर्थमंत्री आणि एकूणच केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. दरवर्षी पाडव्याच्या दिवशी बारामतीत व्यापाऱ्यांच्या वतीने मार्गदर्शन मेळावा आयोजित केला जातो. त्यामध्ये शरद पवार हे जागतिक धोरण आणि देशांतर्गत धोरण यावर व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करतात. आज ही नेहमीप्रमाणेच हा मेळावा झाला.

    या मेळाव्यात शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, यूपीएच्या काळात व्यापारी व सहकार क्षेत्रातील अनेक लोकहिताचे कायदे केले. शेतकरी आणि व्यापारी यांच्या विचाराचे सूत्र घेऊन काम केल्यास बाजार पेठेला वेगळे स्थान निर्माण होते. व्यापार सुलभ पद्धतीने झाला पाहिजे आणि चार पैसे शेतकरी, व्यापारी यांच्या पदरात पडले पाहिजे अशी भूमिका घेऊन त्या काळात काम केले गेले, मात्र आता केंद्र सरकारचा या घटकाकडे बघण्याचा दृष्टीकोन सामंजस्यपणाचा आहे, असे मला दिसत नसल्याचं ते म्हणाले.

    देशातील व्यापारी धोरणे ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला असतो, मात्र निर्णय घेताना उत्पादक आणि व्यापार यांचा समन्वय महत्वाचा असला पाहिजे, परंतु केंद्र सरकार चालवत असताना अनेक महत्त्वाची धोरणे लोकांना कळत नाहीत याचे कारण सुसवांद नाही, असं शरद पवार म्हणाले.

    पवार पुढे असेही म्हणाले की, आजचे अर्थमंत्री आणि व्यावसायिक घटक यांच्यात कोणतीही चर्चा होताना दिसत नाही. हल्लीच्या केंद्रीय अर्थमंत्री कधी भेटल्या नाहीत. काही चर्चा नाही. सुसवांद नाही. व्यापार आणि त्यांचे इतर घटक यांना विचारात घेतले जात नाही. पंतप्रधान हे ही यात लक्ष देत नाहीत . ते यात हस्तक्षेप करत नाहीत त्यांनी यात लक्ष न दिल्याने अनेक समस्या उभ्या राहतात.
    कामाचा अर्धावेळ केसेस लढण्यातच जातोय, हारेंगे जितेंगे बाद में मगर लढेंगे जरुर; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं
    शरद पवार यांनी आणखी एक गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला ते म्हणाले, संसदेच्या सभागृहात एक तास देखील पंतप्रधान आले नाहीत, याचा परिणाम अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यावर होतो. एकीकडे पक्ष फोडीचे राजकारण कसे लक्ष देऊन करतात. त्यांची ही भूमिका केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होते आणि त्याचा परिणाम नागरिकांच्या मूलभूत प्रश्नावर होतो. माझ्या काळात मी अनेक प्रधानमंत्री पाहिले, मात्र ते कोणत्याही राज्यात गेल्यानंतर त्या राज्यातील मुख्यमंत्र्याबद्दल व्यक्तिगत उद्गार आजवरच्या यापूर्वीच्या कोणत्याही प्रधानमंत्र्यांनी काढलेले मी ऐकले नाही.
    संपूर्ण जगाला माहिती माझी जात कोणती, VIRAL दाखल्यावर शरद पवार पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…
    सध्या पाच राज्यात निवडणुका चालू आहेत त्या ठिकाणी जाऊन प्रधानमंत्री काय बोलतात हे आपण पाहिले. देशाचे मूलभूत प्रश्न सुटू शकत नाहीत त्याचे परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला त्याची किंमत उत्पादक व्यापारी आणि प्रत्येकाला द्यावी लागेल त्याची स्थिती निर्माण होत आहे.

    कारखानदारी कशी वाढेल तयार झालेला माल देशाच्या बाहेर जाईल कसा, आपल्या देशाच्या आर्थिक स्थिती मजबूत कशी होईल याच्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. नवीन कारखानदारी काढण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. अधिकच्या हातांना काम देणे आणि बाजारपेठ बलवान करणे हे काम सरकारचे असते. व्यापारी आणि उत्पादकांच्या प्रश्नावर जागृत राहून योग्य प्रकारची आग्रही भूमिका घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.

    Ajit Pawar : अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार गोविंद बागेत दाखल, स्नेहभोजनाला सहकुटुंब हजेरी लावणार
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed