• Sat. Sep 21st, 2024
जवानाचा कुटुंबासह अपघाती मृत्यू, १८ वर्षांनी न्याय, वृद्ध आई-वडिलांना जवळपास ५० लाखांची भरपाई मिळणार

मुंबई : सांगली-कोल्हापूर रस्त्यावर ट्रकने समोरून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेले भारतीय लष्करातील जवान कॅप्टन शैलेंद्र करंदीकर यांच्या वयोवृद्ध आई-वडिलांना जवळपास १८ वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भरपाईच्या रकमेत भरीव वाढ मिळण्याचा दिलासा मिळाला आहे.

शैलेंद्र यांच्या आई-वडिलांनी सुमारे १८ लाखांच्या भरपाईची मागणी केली होती. त्यांनी सन २००३मध्ये केलेल्या दाव्यावर २८ सप्टेंबर २००५ रोजी निकाल देताना पाच लाख १५ हजार रुपयांची भरपाई देण्याचा आदेश सांगलीमधील मोटार वाहने अपघात दावा न्यायाधिकरणाने (मॅक्ट) दी न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीला दिला होता. त्यामुळे करंदीकर यांनी २००६मध्ये उच्च न्यायालयात अपिल केले होते. त्याचवेळी ‘मॅक्ट’ने चुकीचा निर्णय दिल्याचे म्हणत तो रद्द होण्यासाठी कंपनीनेही अपिल केले होते. त्यावरील सुनावणीअंती न्या. राजेश पाटील यांनी नुकताच हा निर्णय दिला.

‘दावेदार हे एकूण ४८ लाख ८१ हजार ८१६ रुपयांच्या भरपाईसाठी पात्र आहेत. त्यामुळे कंपनीने आधीच्या भरपाईची रक्कम वगळून ४३ लाख ६६ हजार ८१६ रुपये हे दाव्याच्या तारखेपासून (२८ मे २००३) वार्षिक ७.५ टक्के व्याजासह द्यावी’, असे उच्च न्यायालयाने आदेशात नमूद केले.

तेरी मेरी दोस्ती प्यार मे बदल गयी, खाकी वर्दीतच रील, महिला पोलिसाचं निलंबन
२८ जुलै २००२ रोजी २९ वर्षीय शैलेंद्र हे त्यांची पत्नी सोनाली व दोन महिन्यांचे बाळ तसेच पत्नीच्या नात्यातील वैजयंती व त्यांचे पती माधव आणि त्या दोघांचा मुलगा देवदत्त यांच्यासोबत मारुती व्हॅनने नरसोबावाडीहून सांगलीकडे परतत होते. त्यावेळी बसथांब्यावर उभी असलेल्या बसला ओव्हरटेक करताना समोरून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने केवळ देवदत्त वगळता सर्वांचा मृत्यू झाला.

आमदार गीता जैन यांच्या कन्येची ऑनलाईन फसवणूक, मिठाई खरेदी करताना ८० हजारांचा फटका

‘शैलेंद्र यांच्या चुकीमुळेच अपघात झाला. शिवाय त्यांचे वडील पेन्शनधारक असल्याने ते मुलावर अवलंबून नव्हते. परिणामी त्यांना भरपाईचा हक्कच नाही’, असा युक्तिवाद कंपनीतर्फे अॅड. पूनम मित्तल यांनी केला. तर ‘शैलेंद्र यांनी ओव्हरटेक करणे सुरू केले तेव्हा ट्रक ६०० मीटर अंतरावर होता. त्यांनी गाडीची लाइट चालू करून सिग्नल दिला होता. शिवाय रस्ता खूप रुंद असूनही ट्रकचालकाने डावीकडे जाण्याची तसदी घेतली नाही, सिग्नल दिला नाही किंवा आपला वेगही कमी केला नाही. अपघातातून बचावलेल्या माधवने, तसेच अन्य एका प्रत्यक्षदर्शी वाहनचालकाने पोलिसांना दिलेल्या जबाबातून हे स्पष्ट होते. ‘मॅक्ट’ने ट्रकचालकाला जबाबदार धरले, मात्र भरपाईच्या आदेशात चूक केली’, असा युक्तिवाद करंदीकर यांच्यातर्फे अॅड. तेजपाल इंगळे यांनी मांडला. तो उच्च न्यायालयाने ग्राह्य धरला.

भाऊ फ्लॅटवर आलाय, पुण्यात तरुणाला घरी बोलवून नग्न नाचवलं, अश्लील व्हिडिओ शूट करुन व्हायरल

‘ट्रकचालकाचीच हलगर्जी’

‘मारुती व्हॅन ६०० फुटांवर दिसल्याचे मान्य करूनही सिग्नल दिल्याचे किंवा वेग कमी करण्यासाठी ब्रेक दाबल्याचे ट्रकचालकाने ‘मॅक्ट’समोर म्हटले नाही. रस्ता ३४ फूट रुंद व अतिरिक्त पाच फुटांची पांढरी पट्टी असूनही अपघात टाळण्यासाठी त्याने डावीकडे ट्रक नेला नाही. मोठ्या वाहनाच्या चालकाकडून अधिक खबरदारी अपेक्षित असते. तसे घडलेले नाही. त्यामुळे ट्रकचालकच जबाबदार होता, हे स्पष्ट होते’, असे निरीक्षण न्यायमूर्तींनी आपल्या निर्णयात नोंदवले.

बीडमध्ये १२ तासांत २ भीषण अपघात; १० जणांचा मृत्यू,बसचं नियंत्रण सुटलं तर रुग्णवाहिकेला ट्रकची धडक

Read Latest Mumbai Updates And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed