Farmer News Maharashtra : पीक विमा कंपन्यांनी शासनाच्या नियम व अटींवर बोट ठेवून जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे अपील केले. आजही हिंगोली, धुळे, वाशीम, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील आक्षेपांवर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे राज्यातील १६ जिल्ह्यांतील ३५ लाख ८ हजार ३०३ शेतकर्यांना १७०० कोटी ७३ लाख ४९ हजार रुपये मिळणार असले तरी, पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार आहे.