• Mon. Sep 7th, 2026

फार बोलू नका, असा निरोप आलाय; आपण ठरवलं तर ५ मिनिटांत फडणवीसांचा आवाज बंद होईल: मनोज जरांगे

फार बोलू नका, असा निरोप आलाय; आपण ठरवलं तर ५ मिनिटांत  फडणवीसांचा आवाज बंद होईल: मनोज जरांगे

म. टा. प्रतिनिधी, जालना: ‘सर्वपक्षीय बैठकीत काय चर्चा झाली हे माहीत करून घेण्याची आपली अजिबात इच्छा नाही. कोणताच पक्ष मराठ्यांचा नाही, हे आतून सगळेच एक आहेत, मराठ्यांना वेड्यात काढत आहेत’, असे सांगत आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सर्वपक्षीय बैठकीतील ठराव फेटाळून लावला. तसेच, रात्री ९पासून त्यांनी पाणीत्याग आंदोलनास सुरुवात केली.

सर्वपक्षीय बैठकीतील निर्णय आणि ठरावाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमातून जाहीर केल्यानंतर जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेतली. ‘सरकारने चर्चेसाठी यावे, आरक्षण देण्यास नेमका का वेळ लागतोय, आणखी किती वेळ लागेल हे सर्व स्पष्ट सांगावे त्यानंतर मराठा समाज निर्णय घेईल’, असे ते यावेळी म्हणाले.

‘आणखी किती बैठका घेता, इकडे आमची माणसे मरत आहेत. सरकारच वातावरण दूषित करीत आहे. राज्यातील नागरिकांचा सरकारवर रोष आहे. आमचे आंदोलन शांततेत सुरू असून शिंदे-फडणवीस-पवार याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारचीच आहे’, असा इशारा जरांगे यांनी दिला. ‘आपण काही अरेतुरे बोललो, तर वाईट वाटते. ‘फार बोलू नका,’ असे निरोप येत आहेत. दोन दिवस गोड बोलून बघू. आपण ठरवले तर पाच मिनिटांत फडणवीसांचा आवाज बंद होईल. ते दगाफटका करू शकतात. उपोषण मंडपातून मराठा बांधवांना उचलून गुन्हे दाखल केले जात आहेत. जाणूनबुजून प्रशासनातील अधिकारी सरकारचे ऐकत आहेत’, असा आरोपही त्यांनी केला.

फडणवीस तुम्ही चर्चेला या, मराठे तुम्हाला संरक्षण देतील, वेळ दिला तर आरक्षण द्याल का? : जरांगे पाटील

मराठा आंदोलकांवरील खटल्यात वकिलांनी समोर येत बाजू मांडण्याचे आवाहन त्यांनी केले. भाजपचे प्रवक्ते आमदार राणे हे मोबाइलवर फार गोडगोड बोलतात, त्यांनी यापुढे आपल्यासोबत बोलू नये. प्रत्यक्ष भेटीत भाषणाचे स्क्रिप्ट कोण लिहून देतो या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आपण सांगू असे म्हणत राणे यांनी केलेल्या आरोपाचा त्यांनी समाचार घेतला.

Maratha Reservation: उपमुख्यमंत्र्यांचा दगाफटका करण्याचा डाव असू शकतो; मनोज जरांगेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप

प्रमाणपत्र वाटप सुरू

जालना जिल्ह्यात २,७७० कुणबी वंशवळीचे पुरावे सापडले आहेत. त्याचे संगणकीकरण झाले असून कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया लगेच सुरू केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

इंटरनेट बंद

जालना : जिल्ह्यात परिस्थिती शांत आहे. विविध भागातील मराठा आंदोलकांची शांततेत आंदोलने सुरू आहेत. मंगळवारी सायंकाळी इंटरनेट बंद होताच अंतरवाली सराटी परिसरात खूप मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्या आणि १५ हजारांहून अधिक मराठा समाज बांधव अंतरवालीत जमले. त्यानंतर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जरांगे यांना पोलिस कधीच बळजबरीने उचलणार नसल्याचा खुलासा केल्यानंतर पहाटे लोक पांगले.

Pune News : ‘डीजे’विरोधात ध्वनिवर्धन! पुण्यातील मोर्चात बंदीची मागणी, राजकीय नेत्यांचाही समर्थनाचा सूर, पण मोर्चाला विद्यानंद बापट अनुपस्थित; कारण काय?
Yavatmal News: यवतमाळमध्ये भूदानची 33 हजार एकर जमीन बेपत्ता; गैरव्यवहाराची चौकशी सुरु, मोहा गावातील 50 जणांना नोटीस
Baramati Accident : बारामतीहून दहीहंडीसाठी पुण्यात निघाले, नियंत्रण सुटल्याने बाईक घसरली, खाली पडताच भरधाव वाहनाने उडवलं; तरुणाचा जागीच अंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed