• Sun. Sep 22nd, 2024

मराठा समाजाबद्दल गरळ ओकणाऱ्या सदावर्तेंना स्थानबद्ध करा, एकनाथ शिंदेंना तरुणाचं खरमरीत पत्र

मराठा समाजाबद्दल गरळ ओकणाऱ्या सदावर्तेंना स्थानबद्ध करा, एकनाथ शिंदेंना तरुणाचं खरमरीत पत्र

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अहमदनगरमधील एका युवकानं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहून मोठी मागणी केली आहे.

हायलाइट्स:

  • मुख्यमंत्र्यांच्या शपथेवर संताप
  • तरुणाचं खरमरीत पत्र
  • सदावर्तेंवर कारवाईची मागणी

आमच्याकडे ५० कोटी मागितले, दसरा मेळाव्यात शिंदेंनी ठाकरेंना घेरलं

अहमदनगर : दसरा मेळाव्यात आपले भाषण थांबवून मराठा आरक्षणासाठी बांधिल अल्याचे सांगण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शपथ घेतली होती. मात्र, त्यानंतर काहीच हालचाली झाल्या नसल्याने एकीकडे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू झाले आहे. तर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर हा विषय न घेतल्याने कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. त्यातच गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडण्याची घटना घडल्यानंतर सदावर्तेही आक्रमक होऊन टीका करू लागले आहेत. यामुळे वातावरण चिघळत असताना नगरमधील मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्ते आणि स्मायलिंग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींची शपथ घेऊन अवमानच करण्यापेक्षा मराठा समाजावर गरळ ओकून वातावरण बिघडविणाऱ्या सदावर्ते यांना दोन महिने स्थानबद्ध करावे, अशी मागणी तोडमल यांनी केली आहे.

तोडमल यांनी पत्रात म्हटले आहे, महाराष्ट्रात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज व गोळीबाराचा निर्दयी प्रकार घडला. तरीही मराठा समाजाने शांतता बाळगली. ज्यांची वकिलीची सनद जप्त झाली होती, असे समाजात तेढ निर्माण करणारे गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलकांवर गरळ ओकली. सदावर्ते यावरच थांबले नाहीत तर त्यांनी भारतातील सर्वाधिक मोठी आणि शिस्तबद्ध झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला सुध्दा विरोध केला. सोबतच मराठा समाजाची बदनामी होईल अशी वक्तव्य प्रसार माध्यमांतून केले. एकंदरीतच मराठा समाजाविषयी विकृत मानसिकता असलेल्या सदावर्ते यांनी आपले तोंड बंद केलेले नाही. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून काहींनी त्यांच्या आलिशान गाड्या फोडल्या.
मोदींनी शिर्डीत येऊन विचारलं, शेतकऱ्यांसाठी पवारांनी काय केलं? उद्धव ठाकरेंचं पवारांसमोरच उत्तर
आधीच विविध संकटांमुळे पिचलेल्या मराठा तरुणांना सदावर्ते उचकावत आहेत. तर दुसरीकडे सध्या महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत की नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सदावर्ते फक्त मराठा आरक्षण विषय ऐरणीवर आला की मराठा समाजाविषयी असलेला द्वेष व्यक्त करतात. ते असे का करतात की त्यांना कुणी असे करायला सांगत आहे? तरीही त्यांना अद्याप मोकळेच सोडले आहे. त्यामुळे विविध प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे आपण मराठा द्वेषी सदावर्ते यांना महाराष्ट्रात शांतता राखण्यासाठी दोन महिने स्थानबद्ध करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाची भाजप कार्यकर्त्याला मारहाण, आरोपी मोकाट, भाजप कार्यकर्ते थेट फडणवीसांकडे!

मराठा आरक्षणासाठी सामूहिक राजीनामे

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी घारगाव (ता. श्रीगोंदा) येथील ग्रामपंचायत पदाधिकारी-सदस्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. उपसरपंच दत्तात्रय कुचेकर, सदस्य सरिता भूषण बडवे, गोपिका आदिनाथ बांदल, सोपान विठ्ठलराव शिंदे, नारायण गंगाराम खामकर, अनुराधा अंबर खामकर, सिमा भाऊसाहेब जाधव, विद्याताई हनुमंत सांगळे यांनी आपले राजीनामे सरपंच अरुणा खोमणे यांच्याकडे दिले. तर याच मागणीसाठी पाथर्डी तालुक्यात भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांची गाडी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांना अडविली. आरक्षणासाठी तुम्ही काय प्रयत्न करीत आहात, असा प्रश्न विचारून राजीनाम्याची मागणी केली. निषेधाच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
पाकिस्तानचा रडीचा डाव, रिझवान मैदानात भांडायलाच लागला, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय…

Read Latest Maharashtra News And Marathi News

विजयसिंह होलम यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed